शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 15:07 IST

काळा पैसा बाहेरुन आणण्याच्या आश्वासनासह नोटाबंदीचे धोरण फसले. त्यानंतर आता केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेसह देशातील बँकींग क्षेत्र सीबीआय, ईडी सारख्या संस्थांवर हल्ले सुरू केले आहेत.

ठळक मुद्देमोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात वर्षभर मंदीचे वातावरण कायम सत्ता परिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणार नसल्याचा दावाट परदेशी गुंतवणुकीचा बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला

बारामती -  काळा पैसा बाहेरुन आणण्याच्या आश्वासनासह नोटाबंदीचे धोरण फसले. त्यानंतर आता केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेसह देशातील बँकींग क्षेत्र सीबीआय, ईडी सारख्या संस्थांवर हल्ले सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली.

बारामती येथे दि मर्चंटस असोसिएशनच्या वतीने पाडव्यानिमित्त पवार हे व्यापाऱ्यांशी दरवर्षी संवाद साधून देशातील व्यापार, अर्थव्यवस्थेबाबत माहिती देताता.यंदा पवार यांनी  बाजारपेठेतील मंदीला केंद्र सरकारचे निर्णय कारणीभुत असल्याचे सांगत सत्ता परिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणार नसल्याचा दावा केला. यावेळी  पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बाहेर देशातील काळा पैसा आणून सामान्यांच्या खात्यावर भरण्याचे दाखविलेले स्वप्न दिवास्वप्न ठरले. त्यानंतर देशातील काळा पैसा  बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली.मात्र ,ते धोरण देखील फसले. सरकारने आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय शहाणपणाचे नाहीत. इतर कोणतेही निर्णय चुकले तर थोडा फार परिणाम होतो. मात्र अर्थकारणातील निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेसह व्यापार उद्योगांना भोगावे लागतात. 

केंद्रात एकाच पक्षाची बहुमताने एकहाती सत्ता असताना देशातली प्रशासन व्यवस्था आणि अर्थव्यवस्था योग्य मार्गाने चालणं आवश्यक आहे. मात्र सध्या तसं पाहायला मिळत नाही. रिझर्व्ह बँकेशी देशाच्या विकासाबाबत चर्चा करून काही धोरणं ठरवायची असतात. या संस्थेला आदेश देण्याची भुमिका कधीच स्वीकारली जात नाही. पुर्वी मोठा नावलौकीक असणाऱ्या रघुराम रजन यांना आरबीआय च्या गव्हर्नर पदाची सूत्र देण्यात आली. मात्र, राजन यांनी आरबीआयच्या स्वायत्ततेबाबत तडजोड होऊ न देण्याची भुमिका घेतल्याने त्यांची  सुट्टी झाली. त्यानंतर गुजरात येथील उर्जित पटेल यांची त्या  पदावर नियुक्ती झाली. मात्र, देशात प्रथमच आरबीआयकडुन 16 हजार कोटींची रक्कम देश चालविण्यासाठी मागण्यातआली. मात्र,आरबीआय प्रमुखांनी त्याला नकार दिला. याचा अर्थ राष्ट्रीय संस्था दुबळी करण्याचा हा प्रयत्न आहे. आरबीआय वर एकप्रकारे हल्ला करण्याचा हा प्रकार असल्याची टीका पवार यांनी केली.

पवार पुढे म्हणाले, मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना थेट परदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेला झेपणारं नसल्याची भूमिका घेत तो विषय प्रलंबित ठेवला. मात्र आताच्या सरकारने घेतलेला निर्णय सध्याच्या मंदीला कारणीभूत ठरला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीचा बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आहे. ज्या संस्थांची  आर्थिक ताकत मोठी आहे. जगातील अनेक  देशात त्यांचा व्यवहार आहे. त्यांच्या  दहा बाय दहाच्या जागेतील किराणा दुकानदाराशी  कशी स्पर्धा होणार, असा सवाल पवार यांनी व्यक्त केला आहे. आता रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी करणे, सीबीआयमधील प्रमुखांबाबत धरसोडीचे निर्णय घेणे, ईडीच्या प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविणे, बँकेच्या प्रमुखांना अटक करण्यासारखे निर्णय चिंताजनक आहेत.

स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली असे कधी घडल नसल्याची चिंता पवार यांनी व्यक्त केली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांवर अटकेची झालेली कारवाईही चुकीची होती.  त्याचा परिणाम बँकांच्या अर्थपुरवठ्यावर झाला, दुष्काळामुळे दैनंदिन गरज असलेल्या धान्य आणि कडधान्यांच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे. उत्पादन घटल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. या सगळ्यांचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची चिन्हं आहेत.त्यामुळे येत्या काळात काटकसरीचं धोरण अवलंबून भरमसाठ खर्च टाळावा लागेल.अन्यथा व्यापाऱ्यांचं दिवाळं निघाल्याचं  दिसेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी सवंग लोकप्रियतेसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी अडचणीत आल्याचे नमुद केले. सर्वच घटकात नाराजी असुन अनेक व्यवसाय डबघाईला आल्याची चिंता व्यक्त केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी