शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा

By नितीन चौधरी | Updated: April 25, 2024 18:01 IST

कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार

पुणे : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार असून यापासून सुमारे २ हजार ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. यातून उसबिलापोटीची शेतकऱ्यांची रक्कम देण्यासाठी कारखान्यांना मदत होणार आहे.

देशातील साखरेची उपलब्धता घटेल या शक्यतेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे केंद्र सरकारने ७ डिसेंबरला उसाचा रस, साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी आणली. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तातडीने याचे गांभीर्य केंद्र सरकारच्या नजरेस आणून दिले. त्यानुसार केंद्र सरकारने १५ डिसेंबरच्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली. यामुळे १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविता आली.

७०० कोटींची मळी होती पडून

मात्र, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्र, कर्नाटक ,गुजरात,तामिळनाडू या राज्यांमधील उसाला फायदा होऊन पूर्वीच्या अंदाजापेक्षा २० ते २५ लाख टनांनी साखरेची उपलब्धता वाढली. सुधारित वाढीव साखर उपलब्धतेची आकडेवारी आणि त्या आधारे देशभरातील कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे ७ लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याबाबत महासंघाने केंद्र सरकारला दिले. या मळीची किंमत सुमारे ७०० कोटी रुपये आहे. बंदीमुळे या मळीचा वापर करता येत नव्हता पर्यायाने कारखाने अडचणीत आले होते. महासंघाच्या पत्रानंतर केंद्र सरकारने या मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यास अखेर परवानगी दिली असून आसवानीनिहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे बी हेवी मळीच्या शिल्लक साठयांमध्ये अडकलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयाची रक्कम मोकळी होणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या ३८ कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे २ हजार ३०० कोटी रुपये इतकी रक्कम देशभरातील कारखान्यांना उपलब्ध होणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाचे बिल वेळेत व पूर्णपणे होण्यात मोठी मदत होईल. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSocialसामाजिकMONEYपैसा