शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

खरिपातील नुकसानीचा आकडा ९४ लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 2:44 AM

पिकांच्या उत्पादकतेमध्ये होणार घट

पुणे : अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. तसेच, शेतात पाणी साचून राहिल्याने जवळपास सर्वच खरीप पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होणार असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भात, ऊस, फळे आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.राज्यात ऊस पिकासह सरासरी खरीप क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, १३९.८८ लाख हेक्टरवरील (९३ टक्के) पेरणी-लागवडीची कामे सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत झाली होती. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी होती. अनेक ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. आॅक्टोबरमध्ये देखील पावसाची हजेरी होती. लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, मका, तूर, हळद, भुईमूग, नाचणी, संत्रा, लिंबू, डाळिंब, पपई, द्राक्ष, ऊस आणि भाजीपाला अशा विविध पिकांचा समावेश आहे.पाणी साचल्याने पिकांवर परिणामसध्या भात व नाचणी पिकांची काढणी सुरु असून, भुईमूग पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक बोंड उमलण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणच्या वेचणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तूरही शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांवर विपरित परिणाम झाला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.