शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

मावळात आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवरील खटले घेणार मागे : राज्य शासनाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 20:37 IST

पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देगोळीबारात झाला होता तीन शेतक-यांचा मृत्यू याप्रकरणी राज्यशासनाने शेतक-यांवरील दाखल गुन्हा मागे घेण्याचा निर्णय प्रत्येकाची गुन्ह्यातील भूमिका खटल्यादरम्यान स्पष्ट करणे अवघड

पुणे : पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.    खटले मागे घेण्याबाबत सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर याबाबतची कागदपत्रे सादर करून युक्तीवाद करण्यात आला आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाईपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यास मावळ तालुक्यातील शेतक-यांनी विरोध केला होता. त्यासाठी ९ आॅगस्ट २०११ रोजी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतक-यांचा मृत्यू झाला होता. तर दहा शेतकरी जखमी झाले होते. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. यामध्ये सुमारे ५० पोलीस कर्मचारी आणि १० अधिकारी जखमी झाल्याने आंदोलनात उतरलेल्या २६० शेतक-यांवर फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांची बदलीही करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणात २०१२ रोजी राज्यशासनाने न्यायालयीन समितीही नेमली होती. २०१७ मध्ये शेतक-यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन २६० शेतक-यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंबधी अहवाल त्यांना दिला होता. त्यानंतर याप्रकरणी राज्यशासनाने शेतक-यांवरील दाखल गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.      सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड.राजेश कावेडीया यांनी न्यायालयाकडे क्रिमीलन प्रोसिजरच्या कलम ३२१ अन्वये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. क-हाळे यांच्याकडे हा अर्ज दाखल केला. यात २६० शेतक-यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात दगडफेक करणे, वाहने जाळण्याचा प्रकार घडला होता. परंतु, प्रत्येक शेतक-यावरील वैयक्तिक गुन्हा सिद्ध करणे अवघड असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले...........प्रत्येकाची भूमिका स्पष्ट करणे अवघड एफआयआरनुसार घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नसून प्रत्येकाची गुन्ह्यातील भूमिका खटल्यादरम्यान स्पष्ट करणे अवघड आहे. त्यामुळे त्यांच्यावरील खटला मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. परंतु, क-हाळे यांच्या न्यायालयाकडून प्रकरण न्या. सोनवणे यांच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी पुन्हा युक्तीवाद होण्याची शक्यता असल्याचे अ‍ॅड. कावेडीया यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरच खटले मागे घेण्या स्थिती स्पष्ट होवू शकते.

 

टॅग्स :Puneपुणेmavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस