शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात नदीच्या दुषित पाण्यामुळे वेगात पसरतोय कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 16:40 IST

नारायणगाव परिसरात दहा कुटुंबांमध्ये एक तरी कॅन्सरग्रस्त...

- श्रीकिशन काळे

पुणे : मीना नदीकाठी राहणे धोकादायक बनले आहे. कारण माणसांनीच प्रदूषण वाढविले आणि नद्या प्रदूषित झाल्या. रासायनिक औषधांचा मारा प्रचंड होत आहे. त्याने जमिनीतून पाणी झिरपत नद्यांना मिळतेय. परिणामी मीना नदीत जस्त, मक्युरी, पारा असे धातू आणि कीटकनाशके दिसून आली. यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. नारायणगाव परिसरात दहा कुटुंबांमध्ये एक तरी कॅन्सरग्रस्त असल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नारायणगाव परिसरातील मीना नदीच्या प्रदूषणाबाबत गेल्या तीन महिन्यांपासून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील एनसीएलचे (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, यशदाचे जलसाक्षरता अभियानाचे माजी कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुजित निलेगावकर, स्वाती दीक्षित, वीणा पाटील आदींनी सहभाग घेतला. या टीमने मीना नदीच्या उगमापासून घोड नदीच्या संगमापर्यंतच्या नदीकाठची पाहणी केली. तेथील पाण्याचे नमुने घेतले. त्यातील प्रदूषण तपासले. पावसाळ्याअगोदर काही नमुने घेतले आणि पावसाळ्यात काही नमुने घेतले. त्यानंतर प्रयोगशाळेत त्यात काेणते प्रदूषण आहे ते पाहिले. या पाण्यात घातक धातू असल्याचे स्पष्ट झाले. प्रदूषित पाणी शेतीसाठी वापरले जाते. विहिरींचे पाणी खराब झाले, त्याने मानवी आरोग्य धोक्यात आले.

तीन महिने नदीवर काम

नारायणगावातून ही मीना नदी वाहते. प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग म्हणून या नदीवर तीन महिने सर्वेक्षण केले. नदीचा परिसर ५५ किमीचा आहे. तिथे कुठेही कारखाने नाहीत. केवळ एक साखर कारखाना आहे. त्यामुळे उद्योगाचे प्रदूषण नदीमध्ये नाही. कृषिक्षेत्र आणि घरगुती पाण्यातून प्रदूषण होत आहे. शेतात रासायनिक औषधांचा भडिमार केला जात आहे. तेच झिरपून नदीला मिळते, तर घरांमध्ये टुथपेस्ट, फिनेल, कपडे धुण्यासाठीचा डिटर्जंट, शाम्पू आदी केमिकलयुक्त वस्तूंच्या वापराने नदी घाण होत आहे. त्यातूनच जस्त, मक्युरी, पारा नदीच्या पाण्यात येत आहे. तसेच विहिरींमध्येही प्रदूषण पाहायला मिळते. याचा परिणाम कॅन्सर होत आहे.

सोप्या पध्दतीने पाणी शुध्द !

ग्रामीण भागात काही उपाय करता येतील. ते म्हणजे शेवगा व निर्मळी या दोघांच्या बिया उत्तमपणे पाणी शुध्द करतात. शेवग्याच्या बीची एक ग्रॅम पावडर एक लीटर पाणी निर्जंतूक करते. पाण्यातील क्षार, टीडीएस कमी करते. गाळ खाली बसवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी करते. फ्लोराईड मानवी आरोग्याला खूप घातक आहे. तोंडातले दात गायब करते. हाडे ठिसूळ होऊन संधीवात, अस्थिभंग, पाठदुखी हे विकार होतात. चालणेही मुश्किल होते. उच्च रक्तदाब, त्वचारोग, वंध्यत्व, थायराइड असे विकार होतात.

- डॉ. प्रमोद मोघे, निवृत्त शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcancerकर्करोग