शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करा : मंत्री नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 22:55 IST

तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस सरकारने हे केले होते मानधन सुरू

पुणे: आणीबाणी विरोधकांना सरकारने सुरू केलेले दरमहाचे मानधन बंद करण्याची मागणी काँग्रेसचेनितीन राऊत यांनी मंत्रीमंडळ बैठकीत केल्याने या काळात तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने हे मानधन सुरू केले होते. आणीबाणीच्या विरोधात तत्कालीन जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी काम केले होते. आणीबाणीनंतर काही वर्षांनी जनता पक्षातून फूटून त्याच जनसंघीयांनी भारतीय जनता पाटीर्ची स्थापन केली. ते बहुतेकजण आता वृद्ध झाले आहेत. त्याची सरकारी पैशाने सोय लावण्यासाठी म्हणून तत्कालीन सरकारने हे मानधन सुरू केले असल्याचे मत व्यक्त करून राऊत यांनी मानधन बंद करावे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तुरूंगात गेलेले हयात असतील तर त्यांना १० हजार व हयात नसतील तर त्यांच्या पत्नीला ५ हजार याप्रमाणे हे मानधन दिले जाते. बिहार तसेच उत्तरप्रदेश सरकारनेही असे मानधन सुरू केले असून केंद्र सरकारकडून त्यात वाढ व्हावी असा प्रयत्न सुरू असतानाच मंत्री राऊत यांच्याकडून ते बंद करण्याची मागणी झाल्यामुळे आणीबाणी विरोधक संतापले आहेत.पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांनी याबाबत शुक्रवारी थेट राऊत यांनाच मोबाईलवर संपर्क करून आपला रोष व्यक्त केला. एकबोटे म्हणाले, राऊत राजकारणात असूनही त्यांना आणीबाणीची काहीच माहिती नाही. देशात आणीबाणीला पहिला विरोध पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध झाला. त्यात जनसंघाचे लोक होते. त्यांच्यासमवेत अनेक पुरोगामी लोकही तुरूंगात गेले. देशात सर्वत्र हाच प्रकार होता. आता ते सर्वच कार्यकर्ते राजकारणातून निवृत्त झाले असून वृद्ध झाले आहेत. त्यांची कौटुंबिक आर्थिक अवस्था चांगली नाही. त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्याच भावनेतून फडणवीस सरकारने हे मानधन सुरू केले आहे.त्याला अजून वर्षही झाले नाही तोच सत्ताबदल झाला व आता राऊत लगेचच मानधन बंद करण्याची मागणी का करत आहेत तेच कळत नाही. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लगेचच पंतप्रधानपद स्विकारलेल्या राजीव गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात देशवासियांची माफी मागितली होती हे तरी राऊत यांनी लक्षात घ्यायला हवे होते असे मत एकबोटे यांनी व्यक्त केले. राऊत काय म्हणाले त्याची माहिती देताना एकबोटे म्हणाले, मी त्यांच्याकडे माझा संताप व्यक्त केला आहे. पत्र दिल्याचे त्यांनी मान्य केले. मी पत्र मागे घ्या अशी मागणी केल्यानंतर त्यांनी याविषयाची अधिक माहिती घेऊन विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे एकबोटे यांनी सांगितले.      

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊतcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस