शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:12 IST

पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे.

पुणे : पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे. १० ते ११ हजार ज्येष्ठ नागरिक व सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना यामुळे दरमहा जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर अंतरानुसार रक्कम होते, त्यात सवलत देणारा पास तर रद्दच करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गरज नसतानाही आॅल रूट्सचा ७५० रुपयांचा पास घ्यावा लागतो. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरीच घेतली नसल्याची टीका यावर होत आहे.पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जातो. आॅगस्ट २०१७मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केली गेली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासचा दर ४५० रुपयांहून एकदम ७०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ ५६ टक्के आहे. विद्यार्थ्यांच्या पासचा दर ६०० रुपये होता. तो आता ७५० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ २५ टक्के आहे. सामान्य प्रवासी पासचा दर १ हजार २०० रुपये होता, तो १ हजार ४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ १७ टक्के आहे.यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत शहराचा मध्यभाग सोडून उपनगरांमध्ये राहायला गेलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ४५० रुपयांऐवजी त्यांना एकदम ७०० रुपये म्हणजे २५० रुपये जास्तीचे दरमहा मोजावे लागत आहेत. त्यातही अंतराचा पास तर बंदच केल्यामुळे प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही या विद्यार्थ्यांना पाससाठी ७०० रुपयेच द्यावे लागत आहेत.वास्तविक, सवलतीपोटी पीएमपी काहीही तोटा होत नाही, कारण जेवढ्या रकमेची सवलत दिली जाते, तेवढी रक्कम महापालिका त्यांना अदा करते. १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत अथवा महाविद्यालयात जाण्यासाठी सवलतीच्या पासचा लाभ घेतात. त्यांना वाढीव दर द्यावा लागत असल्यामुळे पालकही त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएमपीच्या या दरवाढीचा त्रास होत आहे. महापालिका अनुदान देत असूनही पीएमपीने दर वाढविण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरण कोणीही देत नाही. महापालिकेकडून अदा होणारे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे पाससाठी जे पैसे रोख मिळतात त्यात वाढ व्हावी, या हेतूने ही वाढ करण्यात आली असल्याचे समजले.ही दरवाढ झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवासी संघटना यांच्याकडून बरीच टीका झाली. त्याची महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तसेच विरोधी पक्षांनीही दखल घेतली व पीएमपीच्या अधिकाºयांना बैठकीस बोलावले. मात्र, त्यांनी दुय्यम अधिकारी पाठवल्यामुळे ती बैठकच झाली नाही. नंतर मात्र महापालिका पदाधिकाºयांनीच पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व दरवाढीबाबत चर्चा केली. त्यात याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता त्याला महिना होऊन गेला तरीही काही झालेले नाही.पदाधिकारीही हे विसरून गेले आहेत व पीएमपीही. त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून दरमहा जास्तीचीच रक्कम घेतली जात आहे.प्रवासी मंचाचा लढा कायममहापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीविरोधात आवाज उठवणे बंद केले असले, तरी प्रवासी मंचाने मात्र आपला विरोध सक्रिय ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र पाठविले असून या बेकायदा दरवाढीची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही या दरवाढीची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. अनुदान मिळत असतानाही दरवाढ करण्याचे काही कारणच नाही, असे मंचाचे म्हणणे आहे.सप्टेंबरमध्ये पासचे नूतनीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जास्तीची रक्कम मागितली जात आहे. अंतराचे पास बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतीचा पास काढायचा असेल, तर ७५० रुपयेच द्यावे लागतील, असे सांगण्यात येते. जुन्या दराने पास द्यायला नकार देण्यात येतो. पालकांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.