शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:12 IST

पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे.

पुणे : पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे. १० ते ११ हजार ज्येष्ठ नागरिक व सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना यामुळे दरमहा जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर अंतरानुसार रक्कम होते, त्यात सवलत देणारा पास तर रद्दच करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गरज नसतानाही आॅल रूट्सचा ७५० रुपयांचा पास घ्यावा लागतो. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरीच घेतली नसल्याची टीका यावर होत आहे.पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जातो. आॅगस्ट २०१७मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केली गेली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासचा दर ४५० रुपयांहून एकदम ७०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ ५६ टक्के आहे. विद्यार्थ्यांच्या पासचा दर ६०० रुपये होता. तो आता ७५० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ २५ टक्के आहे. सामान्य प्रवासी पासचा दर १ हजार २०० रुपये होता, तो १ हजार ४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ १७ टक्के आहे.यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत शहराचा मध्यभाग सोडून उपनगरांमध्ये राहायला गेलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ४५० रुपयांऐवजी त्यांना एकदम ७०० रुपये म्हणजे २५० रुपये जास्तीचे दरमहा मोजावे लागत आहेत. त्यातही अंतराचा पास तर बंदच केल्यामुळे प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही या विद्यार्थ्यांना पाससाठी ७०० रुपयेच द्यावे लागत आहेत.वास्तविक, सवलतीपोटी पीएमपी काहीही तोटा होत नाही, कारण जेवढ्या रकमेची सवलत दिली जाते, तेवढी रक्कम महापालिका त्यांना अदा करते. १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत अथवा महाविद्यालयात जाण्यासाठी सवलतीच्या पासचा लाभ घेतात. त्यांना वाढीव दर द्यावा लागत असल्यामुळे पालकही त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएमपीच्या या दरवाढीचा त्रास होत आहे. महापालिका अनुदान देत असूनही पीएमपीने दर वाढविण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरण कोणीही देत नाही. महापालिकेकडून अदा होणारे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे पाससाठी जे पैसे रोख मिळतात त्यात वाढ व्हावी, या हेतूने ही वाढ करण्यात आली असल्याचे समजले.ही दरवाढ झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवासी संघटना यांच्याकडून बरीच टीका झाली. त्याची महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तसेच विरोधी पक्षांनीही दखल घेतली व पीएमपीच्या अधिकाºयांना बैठकीस बोलावले. मात्र, त्यांनी दुय्यम अधिकारी पाठवल्यामुळे ती बैठकच झाली नाही. नंतर मात्र महापालिका पदाधिकाºयांनीच पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व दरवाढीबाबत चर्चा केली. त्यात याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता त्याला महिना होऊन गेला तरीही काही झालेले नाही.पदाधिकारीही हे विसरून गेले आहेत व पीएमपीही. त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून दरमहा जास्तीचीच रक्कम घेतली जात आहे.प्रवासी मंचाचा लढा कायममहापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीविरोधात आवाज उठवणे बंद केले असले, तरी प्रवासी मंचाने मात्र आपला विरोध सक्रिय ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र पाठविले असून या बेकायदा दरवाढीची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही या दरवाढीची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. अनुदान मिळत असतानाही दरवाढ करण्याचे काही कारणच नाही, असे मंचाचे म्हणणे आहे.सप्टेंबरमध्ये पासचे नूतनीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जास्तीची रक्कम मागितली जात आहे. अंतराचे पास बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतीचा पास काढायचा असेल, तर ७५० रुपयेच द्यावे लागतील, असे सांगण्यात येते. जुन्या दराने पास द्यायला नकार देण्यात येतो. पालकांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.