शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:12 IST

पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे.

पुणे : पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे. १० ते ११ हजार ज्येष्ठ नागरिक व सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना यामुळे दरमहा जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर अंतरानुसार रक्कम होते, त्यात सवलत देणारा पास तर रद्दच करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गरज नसतानाही आॅल रूट्सचा ७५० रुपयांचा पास घ्यावा लागतो. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरीच घेतली नसल्याची टीका यावर होत आहे.पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जातो. आॅगस्ट २०१७मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केली गेली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासचा दर ४५० रुपयांहून एकदम ७०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ ५६ टक्के आहे. विद्यार्थ्यांच्या पासचा दर ६०० रुपये होता. तो आता ७५० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ २५ टक्के आहे. सामान्य प्रवासी पासचा दर १ हजार २०० रुपये होता, तो १ हजार ४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ १७ टक्के आहे.यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत शहराचा मध्यभाग सोडून उपनगरांमध्ये राहायला गेलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ४५० रुपयांऐवजी त्यांना एकदम ७०० रुपये म्हणजे २५० रुपये जास्तीचे दरमहा मोजावे लागत आहेत. त्यातही अंतराचा पास तर बंदच केल्यामुळे प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही या विद्यार्थ्यांना पाससाठी ७०० रुपयेच द्यावे लागत आहेत.वास्तविक, सवलतीपोटी पीएमपी काहीही तोटा होत नाही, कारण जेवढ्या रकमेची सवलत दिली जाते, तेवढी रक्कम महापालिका त्यांना अदा करते. १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत अथवा महाविद्यालयात जाण्यासाठी सवलतीच्या पासचा लाभ घेतात. त्यांना वाढीव दर द्यावा लागत असल्यामुळे पालकही त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएमपीच्या या दरवाढीचा त्रास होत आहे. महापालिका अनुदान देत असूनही पीएमपीने दर वाढविण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरण कोणीही देत नाही. महापालिकेकडून अदा होणारे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे पाससाठी जे पैसे रोख मिळतात त्यात वाढ व्हावी, या हेतूने ही वाढ करण्यात आली असल्याचे समजले.ही दरवाढ झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवासी संघटना यांच्याकडून बरीच टीका झाली. त्याची महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तसेच विरोधी पक्षांनीही दखल घेतली व पीएमपीच्या अधिकाºयांना बैठकीस बोलावले. मात्र, त्यांनी दुय्यम अधिकारी पाठवल्यामुळे ती बैठकच झाली नाही. नंतर मात्र महापालिका पदाधिकाºयांनीच पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व दरवाढीबाबत चर्चा केली. त्यात याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता त्याला महिना होऊन गेला तरीही काही झालेले नाही.पदाधिकारीही हे विसरून गेले आहेत व पीएमपीही. त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून दरमहा जास्तीचीच रक्कम घेतली जात आहे.प्रवासी मंचाचा लढा कायममहापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीविरोधात आवाज उठवणे बंद केले असले, तरी प्रवासी मंचाने मात्र आपला विरोध सक्रिय ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र पाठविले असून या बेकायदा दरवाढीची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही या दरवाढीची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. अनुदान मिळत असतानाही दरवाढ करण्याचे काही कारणच नाही, असे मंचाचे म्हणणे आहे.सप्टेंबरमध्ये पासचे नूतनीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जास्तीची रक्कम मागितली जात आहे. अंतराचे पास बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतीचा पास काढायचा असेल, तर ७५० रुपयेच द्यावे लागतील, असे सांगण्यात येते. जुन्या दराने पास द्यायला नकार देण्यात येतो. पालकांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.