शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

‘बुद्ध’ म्हणजे सद्सदविवेकवादाचा आवाज : प्रेमानंद गज्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 15:58 IST

मँजिस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा जयवंत दळवी स्मृति-पुरस्कार नाटक या वाडमयप्रकारासाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या  ‘ द बुद्धा’ या नाटकास देण्यात येणार आहे. उद्या ( 5 आॅक्टोबर) ज्येष्ठ समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांच्या अध्यक्षतेखाली गज्वी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त गज्वी यांच्याशी साधलेला हा संवाद.

ठळक मुद्दे ‘द बुद्धा’  हे बुद्धांवरचे चरित्रात्मक लेखन मानवी हिताचे रक्षण करणारा बुद्ध धर्म

मँजिस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा जयवंत दळवी स्मृति-पुरस्कार नाटक या वाडमयप्रकारासाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या  ‘ द बुद्धा’ या नाटकास देण्यात येणार आहे. उद्या ( 5 आॅक्टोबर) ज्येष्ठ समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांच्या अध्यक्षतेखाली गज्वी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त गज्वी यांच्याशी साधलेला हा संवाद.------------------------------------------------------------नम्रता फडणीस * या पुरस्कारामागची भावना काय आहे?- पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. आपल्या कामाची दखल घेतली जाते यापेक्षा दुसरे समाधान नाटककाराला असू शकत नाही. *  ‘द बुद्धा’ या नाट़यलेखनामागील पार्श्वभूमी काय ? -   ‘द बुद्धा’  हे बुद्धांवरचे चरित्रात्मक लेखन आहे. हे लिहिण्यामागचा हेतू म्हणजे बुद्धांनी सहा वर्षे वैदिक ब्राह्मणी परंपरेने पद्धतीने तपश्चर्या केली. पण त्यांना ज्ञान प्राप्त झाले नाही.अन्नग्रहण केल्यानंतर त्यांना तरतरी आली. पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी महिनाभर चिंतन केले. त्यांना जे तत्वज्ञान गवसले त्यासंदर्भावर भाष्य करण्यात आले आहे. * नाटकाचा आशय काय आहे?- बुद्धांनी वेगळं काय सांगितले, कारण बोध हा शब्द वैदिक वाडमयात कुठेही नाही. पत्नी यशोधरेला  बुद्ध सोडून गेलेले माहिती नाहीत.  तिला न सांगताच झोपेत सोडून गेले हा पारंपारिक समज आहे. ते जाणार आहेत हे सगळ्यांना माहिती होते. पत्नीशी बोलून जनव्यवस्थेने सांगितल्यामुळे ते सोडून गेले आहेत. जेव्हा बुद्ध परत येतात तेव्हा यशोधरा त्यांना विचारते, तू ज्ञान मिळवलेस म्हणजे नेमके काय केलेस? तिला सांगण्यापासून नाटकाची मांडणी करण्यात आली आहे.* बुद्धांचे तत्वज्ञान काय सांगते?- शांतता, एकमेकांना समजून घेणं, बुद्धीवाद म्हणजे मी सांगतो म्हणून तू मान्य करू नकोस. त्याचं समाधान होईपर्यंत त्याच्या मनातील प्रश्नांचं निरसन करणे, म्हणजे बुद्धतत्वज्ञान आहे. हे चिरकालीन तत्व आहे. जे कालसुसंगत आहे. डॉ. बाबासाहेबांनी बाकीच्या धर्माचा अभ्यास केला होता. पण त्यांना बुद्धांचे तत्वज्ञान पटले. मानवी हिताचे रक्षण करणारा बुद्ध धर्म आहे.* सध्या समाजात जाती, धर्माचा पगडा वाढत आहे. जगभरात असहिष्णुता, अस्थिरता वाढत चालली आहे, अशा काळात बुद्ध तत्वज्ञान कुठं आहे? त्याची सांगड कशी घालता येईल? - जगभरात खूपमोठी हानी झाली, हल्ले झाले की देश शांतता कराराची भाषा करू लागतात. पाकिस्तानबरोबर सर्जिकल स्ट्राईक केले तरी चर्चेची भाषा करतो. म्हणजे इथे बुद्ध तत्वज्ञान आलेच. बुद्धाला वगळून जगभर काहीच होत नाही. बुद्ध म्हणजे सदविवेकवादाचा आवाजच आहे. समाजात परिस्थिती हाताबाहेर गेली की बुद्ध आठवतोच. * लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे वाटते का? लेखनासाठी सध्याचे वातावरण पोषक आहे का?-लेखकांची मुस्कटदाबी होतच आहे. एखाद्या हुकुमशाही करणा-या व्यक्तीबद्द्ल लिहिले तर तो त्याला कारागृहातच पाठवणार ना? पण बुद्धाचा विवेकवादाचा आवाज असेल तर त्याचे मत आहे आणि त्याचा सन्मान आहे, असा विचार तो व्यक्ती करेल  त्यातूनच दोघांमध्ये समन्वय निर्माण होईल. मात्र सध्याच्या काळात माझा कुठलाही प्रकारे पराभव होता काम नये. या मानसिकतेतूनच  दंगे, धोके निर्माण होतात. तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहाणारच आहे. व्यक्तीला संपवल्याने विचार संपत नाहीत. गांधीजींची हत्या केली तरी त्यांचे विचार कुणी संपवू शकलेले नाही. इथेही बुद्धच कामाला येतात. बुद्ध म्हणतात, कुठल्याही तारेतून सूर उत्तम उमटायचा असेल तर ती तार जोरात खेचली तर तुटते आणि ढिली सोडली तर सूर उमटत नाहीत, म्हणून ती अशाप्रकारे तार इतकीच खेचली गेली पाहिजे की त्यातून सूर छान उमटतील. जगण्याचे तसेच आहे. जागतिक स्तरावरही ही तार कमी जास्त ओढली जाते तेव्हा संघर्ष होतोच.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबई