शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

बीअारटी मार्ग की अपघात प्रवण क्षेत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 17:40 IST

बीअारटी मार्गामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले असून त्यात 3 प्राणांतिक अपघात झाले अाहेत.

पुणे :  उपनगरातील प्रवाशांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली. शहरातील विविध मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात अाली. सुरुवातीपासूनच यामध्ये अनेक त्रृटी असल्याचे समाेर अाले हाेते. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्या सुधारण्याचा फारसा प्रयत्न हाेत नसल्याचे चित्र अाहे. गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये बीअारटी बसेसचे एकूण 18 अपघात झाले असून या अपघातांमध्ये 3 जणांना अापले प्राण गमवावे लागले अाहेत. 

     बीअारटी मार्गातील अडचणींची मालिका संपता संपत नसल्याचे चित्र अाहे. खासकरुन संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड वरील मार्गांमध्ये अनेक त्रृटी अद्याप राहिल्या अाहेत. बीअारटी मार्गातील सर्वात माेठी अडचण ही या मार्गांमध्ये हाेणारी खासगी वाहनांच्या घुसखाेरीची अाहे. दरराेज अनेक खासगी वाहने या बीअारटी मार्गांमध्ये घुसखाेरी करतात. ही वाहने तसेच बस वेगात असल्याने अनेक प्राणांतिक अपघात या मार्गात घडले अाहेत. ही घुसखाेरी राेखण्यासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात अाली हाेती. परंतु त्यांचे सुद्धा वाहनचालक एैकत नसल्याचे चित्र अाहे. त्यानंतर पीएमपी कडून हे मार्ग सुरु हाेतात तेथे रस्सी लावण्याचा प्रयत्न केला. याने थाेडा फरक पडला असला तरी अनेक वाहनचालक दमदाटी करुन वाॅर्डनला ही रस्सी खाली घेण्यास भाग पाडतात. तसेच रात्रीच्या वेळी हा मार्ग माेकळाच असताे. त्यामुळे खासगी वाहने बेधडकपणे या मार्गातून जात असतात. संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गात काही भागातील वळणे ही अपघाताला निमंत्रण देणारी अाहेत. त्यात कुठलिही सुधारणा करण्यात अाली नाही. त्यामुळे  पीएमपी प्रशासन या मार्गांकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे चित्र अाहे. 

    पीएपीकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले अाहेत. त्यात 3 लाेकांना अापला प्राण गमवावा लागला अाहे तर दाेन जण गंभीर जखमी झाले अाहेत. 13 किरकाेळ अपघात झाले अाहेत. पीएमपी बसेस व्यतिरिक्त खासगी वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातांची संख्याही अधिक अाहे. त्यामुळे हा बीअारटी मार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग ठरत अाहे. याबाबत बाेलताना पीएपपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, उपनगरातील नागरिकांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी सुरु करण्यात अाली. परंतु बीअारटी मार्ग सुरु करताना ज्या प्राथमिक गाेष्टींची पुर्तता करणे अावश्यक अाहे त्या केल्या गेल्याच नाहीत. फक्त बीअारटी बसेससाठीच हा डिडीकेटेड काॅरिडाॅर असणे अावश्यक हाेते, परंतु तसे ते दिसत नाही. त्यामुळे जलद वाहतूकीचे जे पीएमपीचे उद्दीष्ट हाेते तेच फाेल ठरले अाहे. प्रशासनाकडून या मार्गांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचा परिणाम या अपघातांमधून दिसून येत अाहे. या मार्गांमध्ये सुधारणा करण्याची प्रशासनाची इच्छा शक्ती नाही. यात सामन्य नागरिकांचा हाकनाक जीव जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune BRTपुणे बीआरटीVishrantwadiविश्रांतवाडीPMPMLपीएमपीएमएल