शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

लाच घेतली, तरीही 'त्यांची' खुर्ची कायम; शिक्षण विभागात सर्वाधिक लाचखोर अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:44 IST

लाचखोरांना त्या-त्या खात्याने तातडीने निलंबित करणे अपेक्षित असते. मात्र, अनेक शासकीय विभागातून अशा लाचखोरांना अभय दिले जाते...

विवेक भुसे

पुणे : सरकारी काम करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सापळा रचून लाच घेताना पकडले जाते. त्याची माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते. अशा लाचखोरांना त्या-त्या खात्याने तातडीने निलंबित करणे अपेक्षित असते. मात्र, अनेक शासकीय विभागातून अशा लाचखोरांना अभय दिले जाते. राज्यभरातल्या अशा १६६ लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्यानंतरही त्यांचे निलंबन न झाल्याने त्यांची खुर्ची अद्याप कायम आहे.

त्यामध्ये १५ वर्ग १ चे अधिकारी, १३ वर्ग २ चे अधिकारी, ८४ वर्ग ३ चे आणि ५ वर्ग ४ चे कर्मचारी व ४९ इतर यांचा समावेश आहे. लाच घेतली असतानाही अजूनही खुर्चीवर कायम असलेल्यांची शिक्षण विभागात सर्वाधिक ४४ जण असून, त्या खालोखाल ३१ जण ग्रामविकास खात्याचा समावेश आहे. महसूल, नोंदणी विभागातील सोळा जणांचा समावेश आहे.

१६६ जणांच्या निलंबनाचा मुहूर्त सापडेना

लाच घेतल्यानंतर अनेक प्रकरणात संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली गेली. त्यातील काही जणांनी इतरांच्या माध्यमातून लाच घेतली असल्याने त्यांना अटक झाली नाही. तरीही त्यांचा अहवाल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. असे असेल तरी वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालताना दिसत असून, राज्यातील अशा १६६ लाचखोरांना निलंबित करण्याचा मुहूर्त अद्याप या अधिकाऱ्यांना सापडलेला नाही.

महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर

शिक्षण विभागात सर्वाधिक ४४ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी निलंबित न झाल्याने अजूनही आपल्या पदावर कार्यरत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुलै २०१४ मध्ये आग्रीपाडा येथील मुख्याध्यापक, क्लार्कवर कारवाई केली होती. तसेच ऑगस्ट २०१४ मध्ये एक सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्याकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. शिक्षण विभागातील लाचखोरांवर कारवाईचे अधिकार असलेल्यांपैकी शिक्षण संचालकांकडे अधिकार असणारी सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात दिसून येते.

राज्यभरात आतापर्यंत ७२० सापळा कारवाया झाल्या. त्यात महसूल विभाग आघाडीवर आहे. राज्यात १६८ कारवाया या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झाल्या आहेत. त्याखालोखाल पोलीस विभागात १६५ कारवाया झाल्या आहेत.

सापळा प्रकरणात ज्या आरोपींविरुद्ध कारवाई केली. त्यापैकी अद्यापपर्यंत निलंबित न केलेले जिल्हानिहाय आरोपी पुढीलप्रमाणे -

मुंबई -१६

ठाणे - २४

पुणे - १०

नाशिक- २

नागपूर - ४९

अमरावती - १९

औरंगाबाद - १८

नांदेड - २८

टॅग्स :PuneपुणेBribe Caseलाच प्रकरणMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी