शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:45 IST

कोरोना संकटाचे ढग संपूर्ण देशावर गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे...

ठळक मुद्देतुर, मूग, उडीद, बाजरी व सोयाबीनची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड 

सुषमा नेहरकर -शिंदेपुणे : संपूर्ण देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे. कोरोनामुळे सर्व क्षेत्रातील लोकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच, एकट्या पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरी तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी 12 हजार 239 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. 

संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील भाताची पुर्नलागवड लांबणीवर पडल्या असून, भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु जुन महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. 

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्र संकटा सापडले असले तरी कृषी क्षेत्राने शेतक-यांना चांगला आधार दिला आहे. त्यात यंदा जुन महिन्यांत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने आता पर्यंत सरासरीच्या 125 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गत वर्षी आता पर्यंत 12 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 1लाख 84 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या होतात. यामध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात खरीपाचे क्षेत्र अधिक आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर हे तालुके रब्बीचे तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु जुन महिन्या चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्यातच चांगला पाऊस झाला. यामुळे यंदा अनेक वर्षांनंतर रब्बीच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजरी, तूर, मूग उडीद आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळेच जिल्ह्याच्या खरीपाच्या लागवडी क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. ---- पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड लांबणीवर पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी लागवड क्षेत्र 57 हजार 964 हेक्टर ऐवढे आहे . त्यापैकी आता पर्यंत केवळ 20 हजार 743 हेक्टर क्षेत्रावरच भाताची पुर्नलागवड झाली आहे. संपूर्ण जुलै महिन्या पावसाने ओढ दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात उत्पादक शेतक-यासह सर्वच शेतकरी अडचणीत सापडतील.----जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांची लागवडची माहिती पिकाच नाव                सरासरी क्षेत्र          प्रत्यक्ष पेरणी       टक्केभात                            57964                    20743              36बाजरी                         38761                    52614               136तूर                              1920                       9011                469मूग                           13804                     14838              107उडीद                        1557                         2479                159 भुईमूग                    16090                       14886               93 सोयाबीन                17472                        19932                 114

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीRainपाऊस