शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:45 IST

कोरोना संकटाचे ढग संपूर्ण देशावर गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे...

ठळक मुद्देतुर, मूग, उडीद, बाजरी व सोयाबीनची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड 

सुषमा नेहरकर -शिंदेपुणे : संपूर्ण देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे. कोरोनामुळे सर्व क्षेत्रातील लोकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच, एकट्या पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरी तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी 12 हजार 239 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. 

संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील भाताची पुर्नलागवड लांबणीवर पडल्या असून, भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु जुन महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. 

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्र संकटा सापडले असले तरी कृषी क्षेत्राने शेतक-यांना चांगला आधार दिला आहे. त्यात यंदा जुन महिन्यांत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने आता पर्यंत सरासरीच्या 125 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गत वर्षी आता पर्यंत 12 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 1लाख 84 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या होतात. यामध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात खरीपाचे क्षेत्र अधिक आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर हे तालुके रब्बीचे तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु जुन महिन्या चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्यातच चांगला पाऊस झाला. यामुळे यंदा अनेक वर्षांनंतर रब्बीच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजरी, तूर, मूग उडीद आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळेच जिल्ह्याच्या खरीपाच्या लागवडी क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. ---- पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड लांबणीवर पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी लागवड क्षेत्र 57 हजार 964 हेक्टर ऐवढे आहे . त्यापैकी आता पर्यंत केवळ 20 हजार 743 हेक्टर क्षेत्रावरच भाताची पुर्नलागवड झाली आहे. संपूर्ण जुलै महिन्या पावसाने ओढ दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात उत्पादक शेतक-यासह सर्वच शेतकरी अडचणीत सापडतील.----जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांची लागवडची माहिती पिकाच नाव                सरासरी क्षेत्र          प्रत्यक्ष पेरणी       टक्केभात                            57964                    20743              36बाजरी                         38761                    52614               136तूर                              1920                       9011                469मूग                           13804                     14838              107उडीद                        1557                         2479                159 भुईमूग                    16090                       14886               93 सोयाबीन                17472                        19932                 114

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीRainपाऊस