शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:23 IST

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते

पुणे : देशामध्ये १९५४ ते २०२४ पर्यंत ५० जणांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रांतील ७ जणांचा गौरव झाला. मराठी असलेल्या लता मंगेशकर यांचा त्यात समावेश आहे; पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके यांना मात्र अद्याप ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात बॉलिवूड कलाकारांना अधिक पद्म पुरस्कार मिळाले, त्यांच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडे दुर्लक्ष होत आहे.

देशात महाराष्ट्रातील २६९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मभूषण तर पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हे अपवाद सोडता महाराष्ट्रात राहणाऱ्या परंतु मराठी नसलेल्या २१६ जणांना पद्म पुरस्कार दिले आहेत. ज्या मराठीत्तर व्यक्तींना पुरस्कार दिले गेले, त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका नाही. या व्यक्ती सर्वस्वी पुरस्काराला पात्र आहेतच; परंतु महाराष्ट्राच्या नावावर २६९ संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत, अशी खंत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. हेच तामिळनाडूत तब्बल १४७ पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषक कोणीही नाही. कर्नाटकातील ४३ जणांना, आंध्र व तेलंगणाच्या ५९ जणांना, केरळच्या ५१ जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते. पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे ७०, ५१ पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांची सांस्कृतिक जगतावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष पटते.

महाराष्ट्रासाठी पद्म पुरस्कारांचा विचार करताना बॉलिवूड, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती व मराठी माणसांचा स्वतंत्रपणे विचार केला जावा, अशी मागणी आम्ही केली आहे. पद्म पुरस्कार येत्या काही दिवसांत जाहीर होतील, यावेळी खालील वास्तवाचा जरूर विचार करावा, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी केली.

गेल्या ७५ वर्षांत कलाक्षेत्रातील २६९ पद्म पुरस्कारार्थी महाराष्ट्रातील असल्याचा आनंद आहे; पण यात केवळ ५२ मराठी कलाकारांचा समावेश आहे. सर्वोच्च भारतीय सन्मान असणाऱ्या ५० भारतीयांनंतरही फक्त एक मराठी कलाकार अर्थात गानसम्राज्ञी लतादीदींचे नाव आहे. आणि भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते. बॉलिवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते, हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल. -बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाMarathi Actorमराठी अभिनेताcultureसांस्कृतिकSocialसामाजिक