शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:23 IST

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते

पुणे : देशामध्ये १९५४ ते २०२४ पर्यंत ५० जणांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रांतील ७ जणांचा गौरव झाला. मराठी असलेल्या लता मंगेशकर यांचा त्यात समावेश आहे; पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके यांना मात्र अद्याप ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात बॉलिवूड कलाकारांना अधिक पद्म पुरस्कार मिळाले, त्यांच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडे दुर्लक्ष होत आहे.

देशात महाराष्ट्रातील २६९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मभूषण तर पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हे अपवाद सोडता महाराष्ट्रात राहणाऱ्या परंतु मराठी नसलेल्या २१६ जणांना पद्म पुरस्कार दिले आहेत. ज्या मराठीत्तर व्यक्तींना पुरस्कार दिले गेले, त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका नाही. या व्यक्ती सर्वस्वी पुरस्काराला पात्र आहेतच; परंतु महाराष्ट्राच्या नावावर २६९ संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत, अशी खंत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. हेच तामिळनाडूत तब्बल १४७ पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषक कोणीही नाही. कर्नाटकातील ४३ जणांना, आंध्र व तेलंगणाच्या ५९ जणांना, केरळच्या ५१ जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते. पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे ७०, ५१ पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांची सांस्कृतिक जगतावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष पटते.

महाराष्ट्रासाठी पद्म पुरस्कारांचा विचार करताना बॉलिवूड, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती व मराठी माणसांचा स्वतंत्रपणे विचार केला जावा, अशी मागणी आम्ही केली आहे. पद्म पुरस्कार येत्या काही दिवसांत जाहीर होतील, यावेळी खालील वास्तवाचा जरूर विचार करावा, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी केली.

गेल्या ७५ वर्षांत कलाक्षेत्रातील २६९ पद्म पुरस्कारार्थी महाराष्ट्रातील असल्याचा आनंद आहे; पण यात केवळ ५२ मराठी कलाकारांचा समावेश आहे. सर्वोच्च भारतीय सन्मान असणाऱ्या ५० भारतीयांनंतरही फक्त एक मराठी कलाकार अर्थात गानसम्राज्ञी लतादीदींचे नाव आहे. आणि भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते. बॉलिवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते, हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल. -बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाMarathi Actorमराठी अभिनेताcultureसांस्कृतिकSocialसामाजिक