शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवला काळा तांदूळ; जाणून घ्या आरोग्यवर्धक तांदळाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:44 IST

मार्गासनी ( पुणे ): वेल्हा तालुक्यातील पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला जास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाच्या लागवडीची जोड देण्याच्या उद्देशाने ...

मार्गासनी (पुणे): वेल्हा तालुक्यातील पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला जास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाच्या लागवडीची जोड देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या काळा भात लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तोरणा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून तब्बल २० एकर क्षेत्रावर काळा भात लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांनी सांगितले. कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून व तोरणा ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने शेतकऱ्यांना काळा भाताच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती दिली व काळा भात लागवडीसाठी प्रेरित केले. काळ्या भाताचे कालीपत्ती व चाको हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. वेल्हा तालुक्यातील मौजे चिरमोडी, मार्गासनी, वांगणी, वांगणीवाडी, अडवली, अस्कवडी, वाजेघर आदी गावांमध्ये काळ्या भाताची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

काळ्या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोगदेखील टाळता येतो. शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील कमी करता येते. असा हा बहुपयोगी औषधी काळा भात पिकवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. साधारणपणे ११० ते १५० दिवसांत (वाणानुसार) या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल एवढे उत्पादन येते जे नियमित भातापेक्षा कमी आहे. मात्र या भाताला भाव नियमित भाताच्या दरापेक्षा चार ते पाच पट अधिक मिळतो. अशा या बहुपयोगी भाताचे उत्पन्न वेल्हा तालुक्यातील शेतकरी करू लागला आहे. कृषी क्षेत्रातील हा नावीन्यपूर्ण बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग ठरेल.

हा काळा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम असल्याने देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठेत अधिक मागणी आहे. साधारण २०० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने याची विक्री होते. याचबरोबर या भाताच्या बियाणांची किंमतदेखील अधिक असून प्रतिकिलो बियाणे ३०० ते ४०० रुपये (वाणानुसार) एवढा दर आहे. वेल्हा तालुक्यात भात शेती ही तुकड्या-तुकड्यात केली जाते. वेल्ह्यात भात शेतीसाठी असणाऱ्या अल्प जागेमध्ये तेवढ्याच श्रमामध्ये काळा भात शेतीमधून शेतकऱ्यांना चार ते पाच पट अधिक उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर काळ्या भाताची लागवड करावी, असे आवाहन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागिरे यांनी केले.

काळ्या भाताचे गुणधर्म -

१. जीवनसत्त्व बी व ईचे उत्तम स्रोत.

२. हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात राहतो.

३.ॲन्टिऑक्सिडेंटचा समावेश.

४. रोगप्रतिकार शक्ती वाढते.

५. पचनशक्ती सुधारते.

शेतकरी बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग व आत्मा अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा यासाठी विकेल ते पिकेल अभियानाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.

-धनंजय कोंढाळकर

तालुका कृषी अधिकारी, वेल्हा

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नMaharashtraमहाराष्ट्रHealthy Diet Planआहार योजना