शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवला काळा तांदूळ; जाणून घ्या आरोग्यवर्धक तांदळाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:44 IST

मार्गासनी ( पुणे ): वेल्हा तालुक्यातील पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला जास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाच्या लागवडीची जोड देण्याच्या उद्देशाने ...

मार्गासनी (पुणे): वेल्हा तालुक्यातील पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला जास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाच्या लागवडीची जोड देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या काळा भात लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तोरणा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून तब्बल २० एकर क्षेत्रावर काळा भात लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांनी सांगितले. कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून व तोरणा ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने शेतकऱ्यांना काळा भाताच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती दिली व काळा भात लागवडीसाठी प्रेरित केले. काळ्या भाताचे कालीपत्ती व चाको हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. वेल्हा तालुक्यातील मौजे चिरमोडी, मार्गासनी, वांगणी, वांगणीवाडी, अडवली, अस्कवडी, वाजेघर आदी गावांमध्ये काळ्या भाताची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

काळ्या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोगदेखील टाळता येतो. शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील कमी करता येते. असा हा बहुपयोगी औषधी काळा भात पिकवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. साधारणपणे ११० ते १५० दिवसांत (वाणानुसार) या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल एवढे उत्पादन येते जे नियमित भातापेक्षा कमी आहे. मात्र या भाताला भाव नियमित भाताच्या दरापेक्षा चार ते पाच पट अधिक मिळतो. अशा या बहुपयोगी भाताचे उत्पन्न वेल्हा तालुक्यातील शेतकरी करू लागला आहे. कृषी क्षेत्रातील हा नावीन्यपूर्ण बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग ठरेल.

हा काळा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम असल्याने देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठेत अधिक मागणी आहे. साधारण २०० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने याची विक्री होते. याचबरोबर या भाताच्या बियाणांची किंमतदेखील अधिक असून प्रतिकिलो बियाणे ३०० ते ४०० रुपये (वाणानुसार) एवढा दर आहे. वेल्हा तालुक्यात भात शेती ही तुकड्या-तुकड्यात केली जाते. वेल्ह्यात भात शेतीसाठी असणाऱ्या अल्प जागेमध्ये तेवढ्याच श्रमामध्ये काळा भात शेतीमधून शेतकऱ्यांना चार ते पाच पट अधिक उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर काळ्या भाताची लागवड करावी, असे आवाहन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागिरे यांनी केले.

काळ्या भाताचे गुणधर्म -

१. जीवनसत्त्व बी व ईचे उत्तम स्रोत.

२. हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात राहतो.

३.ॲन्टिऑक्सिडेंटचा समावेश.

४. रोगप्रतिकार शक्ती वाढते.

५. पचनशक्ती सुधारते.

शेतकरी बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग व आत्मा अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा यासाठी विकेल ते पिकेल अभियानाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.

-धनंजय कोंढाळकर

तालुका कृषी अधिकारी, वेल्हा

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नMaharashtraमहाराष्ट्रHealthy Diet Planआहार योजना