शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पाण्यामुळे पळाले भाजपाच्या तोंडचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 03:04 IST

विरोधकांनी पकडले पेचात : मंत्री, आमदार, महापौर मौनात; पाण्याबाबत भूमिका करेनात स्पष्ट

पुणे : शहराच्या पाणी पुरवठ्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी भाजपाला जेरीस आणले असून त्याला भाजपाचाच मित्र पक्ष असलेली शिवसेना व मनसे फोडणी देत आहेत. त्यामुळे पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष असे भाजपाचे शहरातील सगळे पदाधिकारी मौनात गेले असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

शहरात सगळीकडे भाजपाचीच सत्ता आहे. खासदार अनिल शिरोळे भाजपाचे आहेत. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचेच वर्चस्व आहे. त्यातील गिरीश बापट पालकमंत्री आहेत तर दिलीप कांबळे समाजकल्याण राज्यमंत्री आहे. त्याशिवाय माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर हे आमदार आहेत. शहराचा कणा असलेल्या महापालिकेत भाजपाचे ९८ निवडून आलेले तर ३ स्वीकृत असे तब्बल १०१ नगरसेवक आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते अशी सर्व महत्त्वाची पदे भाजपाकडे आहेत. इतके मोठे राजकीय वर्चस्व असूनही भाजपाला पुण्याच्या पाण्याने बेजार केले आहे. पाण्याचा कोटा वाढवल्याशिवाय संपूर्ण शहराला पाणी पुरवणे शक्य नाही व सरकारकडून कोटा वाढवून आणणे पदाधिकाऱ्यांना शक्य होत नाही. त्यातच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसीप्रमाणे म्हणजे दररोज ६३५ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा आदेश बजावला आहे. त्यात सुधारणा म्हणून ११.५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे, असा जलसंपदाचा आग्रह आहे. महापालिका दररोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे व तरीही ते संपूर्ण शहराला पुरेसे होत नाही. ऐन दिवाळीत पाणीटंचाईची ओरड होऊन त्यानंतर शहराला रोज एकवेळ पाणी पुरवठा सुरू झाला. आता तर एकदिवसाआड पाणी देण्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच नागरिक धास्तावले असल्याचे दिसते आहे. ही सगळी स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला आंदोलनांचा घेरावच घातला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे बिगूलच या रोजच्या आंदोलनातून फुंकले जात आहे. काँग्रेसही आता यात उतरली आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी थेट पालकमंत्र्यांच्या विधानसभा मतदार संघात नुकतेच पाण्यासाठी भजन-गायन आंदोलन केले. पालकमंत्र्यांना सुबुद्धी दे, म्हणून गणपतीची यावेळी आरती करण्यात आली. काँग्रेसमधील सगळे गट-तट या आंदोलनाला मतभेद विसरून जमा झाले होते हे विशेष! राज्यात भाजपाचीच सत्ता असून येथील सत्ताधाºयांना पुण्यासाठी साधा पाणी कोटा मंजूर करून आणता येत नाही, अशी टीका सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्याकडून केली जाते. पक्षनेतृत्त्वानेच आपल्या शहरातील शाखांना वातावरण पेटते ठेवण्याबाबत आदेश दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच रोज किमान एक याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करताना दिसत असून त्यात भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जातात.

शहरातील भारतीय जनता पार्टी यामुळे बेजार झाली आहे. त्यामुळेच बहुधा पालकमंत्र्यांसह सर्वच पदाधिकाºयांनी मौनात जाणे पसंत केले. एरवी विविध विषयांवर सातत्याने मतप्रदर्शन करणारे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही शांत बसणेच पसंत केले आहे. पाण्याची समस्या सुरू झाली त्यावेळेपासून पालकमंत्र्यांनी या विषयावर जाहीरपणे बोलणे टाळले आहे. महापौरांसह सर्वच पदाधिकारी ‘पुण्याचे पाणी कमी होऊ देणार नाही’ असे सांगतात. मात्र, ते कसे साध्य करणार, हे सांगितले जात नाही. जलसंपदा महापालिकेला पत्रावर पत्र पाठवत आहे व महापालिकेकडून त्यावर काहीही केले जात नाही. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीरपणे हा प्रश्न राजकीय झाला असून त्यावर प्रशासन काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच तर भाजपाची आणखीनच राजकीय पंचायत झाली आहे.शिवसेना, मनसेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतकाँग्रेसने शहरातील सर्व चौकांमध्ये निषेध आंदोलन केले. गिरीश बापट व अजित पवार यांची तुलना करणारे व पवार यांनी ऐन दुष्काळातही पुणयाचा पाणी पुरवठा कधी कपात केली नाही, अशा आशयाचे फ्लेक्स शहरात सर्वत्र लावण्यात आले होते. पाण्याच्या प्रश्नावरून भाजपाला राजकीय पेचात पकडण्याचा प्रयत्न सर्व पक्षांकडून केला जात आहे. त्याला शिवसेना व मनसे या पक्षांकडून फोडणी दिली जाते. शिवसेनेचे विजय शिवतारे जलसंपदा राज्यमंत्री आहेत. तरीही शिवसेनेकडून भाजपाला धारेवर धरले जात आहे.

टॅग्स :Puneपुणे