शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर भाजपाची सावध चाल; नेमकं काय म्हणाले फडणवीस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:58 IST

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे...

पुणे : एक नेता म्हणून सत्यजीत तांबेंचे काम चांगले आहे. परंतू जे काही राजकीय निर्णय आहेत ते योग्य वेळी धोरणांप्रमाणे करावे लागतात. नाशिक पदवीधर निवडणुकीबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुण्यात बोलताना म्हणाले, त्या जागेवर भाजप उमेदवार देणार होता. त्याबद्दल आम्ही राजेंद्र विखे पाटलांना ती उमेदवारी घ्यावी अशी मागणी केली परंतू त्यास विखेंनी नकार दिला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे. भाजपने या निवडणुकीद्वारे बाळासाहेब थोरातांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. तर इकडे फडणवीसांनी या निवडणुकीबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. सध्या जो घटनाक्रम तुम्हाला वाटतोय तसा नाहीये, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

पंकजा मुंडे शिवसेनेत (ठाकरे गट) जाणार?

पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे त्याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, मातोश्रीचे दार त्यांच्यासाठी जरी उघडे असले तरी पंकजा मुंडे भाजप कधीच सोडणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचे घर आहे. त्यामुंळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत. 

कोयता गँगवर काय म्हणाले फडणवीस?

कोयतागँगवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अजूनही अधूनमधून कोयता गँगच्या बातम्या येत असतात. अशाप्रकारचे गुन्हे ठेचूनच काढले पाहिजे. आगामी काळात अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्यांवर वेगळ्या प्रकारे कारवाई होताना दिसेल. दहशत कोयता गँगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे. पोलिसांची दहशत लोकांवर, दुकानदारांवर नाही तर गुन्हेगारांवर असली पाहिजे त्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी येत्या काळात आणखी काही उपाययोजना केलेल्या असतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस यांनी ही  माहिती दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसBJPभाजपा