शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

राष्ट्रवादीच्या निनावी पत्रामागे भाजपचा हात ; ''या'' नेत्याचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 20:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना मराठा समाजाचा निकष वापरल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना मराठा समाजाचा निकष वापरल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र संबंधित व्यक्तीने हा पत्रात स्वतःचे नाव लिहिले नसून पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना पत्राची प्रत पाठवणार असल्याचे नमूद केले आहे. याच पत्रावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी तर थेट सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत. 

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या होत्या. त्यात महिला, युवती, युवक, विद्यार्थी अशा विभागांचा समावेश होता. आता त्या नेमणुकांबाबत एका कार्यकर्त्याने थेट नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात माजी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.त्यावर आता चव्हाण यांच्यासह काकडे यांनीही प्रतीक्रिया दिली आहे. 

  

ते म्हणाले, ''सांगली, कोल्हापूर येथे महापुराने जे थैमान घातले आहे, त्यावर मात करण्यासाठी राज्यसरकारची यंत्रणा कुचकामी ठरली. अशावेळी नागरिकांचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. याला छेद द्यायला हवा म्हणून भाजप जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. आम्ही खोलात जाऊन पत्राची चौकशी करू. हे पत्र भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एस यांच्यापैकी कोणत्यातरी कार्यकर्त्याचे कारस्थान असेल. 

चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यादी करतानाही सामाजिक समतोल राखण्याचा कायम प्रयत्न असतो. पहिली यादी आली आहे त्यात समतोल साधला नसेल तर लवकरच पुढचीही यादी जाहीर केली जाईल. यापूर्वीही असा प्रकार झाला आहे. असं पत्र कोणी पाठवत असेल तर चुकीचे आहे. 

दरम्यान  या पत्रात म्हटले आहे की, 'पक्षाने केलेल्या नेमणुका मराठा समाजाच्या असून अल्पसंख्यांक सेलमध्येही याच समाजाच्या व्यक्तींची नेमणूक करावी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा आहे असे समजेल. शिवाय चव्हाण यांच्या काळात एन जी ओ संस्था बळकट झाल्या आणि पक्ष संघटनेचे वाटोळे झाल्याचे म्हटले आहेत. सध्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यावरही पार्ट टाईम काम करत असल्याचा आरोप करण्यात आहे. १५ ते २० कार्यकर्त्यांना घेऊन रोज आंदोलन केल्याने सत्ता येत नसते असा टोलाही लगावला आहे. फक्त शरद पवार किंवा अजित पवार आल्यावर व्यासपीठावर बसण्यासाठी स्पर्धा असते असेही म्हटले आहे. या पत्राचा शेवट करताना यावर लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर कितीही मोठे ऑपरेशन केले तरी पक्ष संघटना कोमात गेलेली दिसेल'. 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा