शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'भाजप शिरूर लोकसभेची जागा एकनाथ शिंदे गटासाठी सोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 12:02 IST

या वक्तव्यामुळे शिरूरमधील सर्वच इच्छुकांचे टेन्शन वाढले जाणार...

पुणे : शिरूर मतदारसंघाची जागा आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटासाठी सोडण्यात येणार आहे, तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे उमेदवार असतील का, हे आताच सांगता येणार नाही. पक्ष त्यावेळी याबाबत योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे शिरूरमधील सर्वच इच्छुकांचे टेन्शन वाढले जाणार आहे.

लोकसभेच्या ज्या १४४ मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत, अशा मतदारसंघात भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात १६, तर पुण्यातील मावळ, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर सिंह यांनी नुकताच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तीनदिवसीय दौरा पूर्ण केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिरूरच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, धनंजय जाधव उपस्थित होते.

सिंह म्हणाल्या, शिरूरचे सध्याचे राष्ट्रवादीचे खासदार नागरिकांना केवळ टीव्ही स्क्रीनवरच दिसत आहेत. ते नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी या मतदारसंघातील नागरिकांनी केल्या आहेत. परिणामी या मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची यादी तयार केली असून, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सादर करणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShirurशिरुरPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र