शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'शिवसेना आणि भाजपची युती होणार का?' काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:57 IST

मागील दोन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा माध्यमांत आहे...

पिंपरी : दोन भाऊ भांडले, दूर झाले. त्यानंतर ते एकत्रही येऊ शकतात. त्यामुळे राज्यात हिंदुत्त्ववाद्यांनी एकत्र यायला हवे. खऱ्या शिवसैनिकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केले. पुन्हा युती होऊ शकते, यावर सुतावोच पाटील यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुढाकार घेतल्यास शिवसेनाभाजपाची पुन्हा युती होऊ शकते, असे मत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा शिवसेना-भाजपची युती होईल का? यावर विचारले. पाटील म्हणाले, ‘‘खऱ्या शिवसैनिकांना आघाडीचा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे तानाजी सावंत, रामदास कदम आणि अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत जाहिरपणे मत व्यक्त केले आहे. राजकाणात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही.’’

लॉकडाउन केले तर लोक रस्त्यावर उतरतील-लॉकडाउन विषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाचा विळखा वाढत आहे. आता लॉकडाऊन परवडणार नाही. दोन वर्षे विद्यार्थी, उद्योग, नोकरदार वर्गाने त्रास सहन केला आहे. लॉकडाऊन केला तर नागरीक रस्त्यावर उतरतील. कडक निर्बंध करायला हवेत. लग्नसोहळे, गर्दीचे कार्यक्रमावर निर्बंध आणावेत. मास्क वापरणार नाहीत. त्यांच्यावर पाचशे नाही तर पाच हजार दंड करायला हवा. निर्बंध कडक करायला हवेत. मात्र, दुर्बिन घेऊन बसू नये.’

अरेरावीमुळे बैठकांना जात नाही-जनजीवन सुरळीत चालावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. मंदिरे, शाळा बंद, बैलगाडा बंद अशो करून चालणार नाही, नियम पाळून सर्वकाही सुरू ठेवायला हवे. सरकारची अरेरावी चालते म्हणून की कोवीडविषयक बैठकांना जात नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील