शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पराभवाच्या भीतीमुळेच भाजपची कॅन्टोन्मेंट निवडणुकीला स्थगिती; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:11 IST

देशातील महागाईवर उपाय करायचा सोडून मोठ-मोठ्या उद्योगपतींना थेट केंद्रांकडून अभय दिलं जातय

पुणे : देशभरात भाजपविरोधी जनमत तयार होत आहे. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने केंद्र सरकारने देशातील सर्व कॅन्टोन्मेटच्या (छावणी मंडळ) निवडणुकांना स्थगिती दिली आहे, अशी टीका काँग्रेसने केली. लोकशाहीत जगण्याचा तेथील नागरिकांचा हक्कच केंद्र सरकार काढून घेत असून, अशीच स्थिती देशातील सर्वच जनतेवर येऊ शकते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, देशात सर्वत्र महागाई वाढली आहे. केंद्र सरकार त्यावर काहीच उपाय करायला तयार नाही, त्याऐवजी मोठ-मोठ्या उद्योगपतींना थेट केंद्रांकडून अभय दिले जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा बेसुमार वापर सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या केंद्र सरकारविषयी लाेकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसते. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला हे त्याचेच द्योतक आहे. त्याआधी दिल्ली, पंजाब या राज्यांमधील जनतेनेही त्यांना पराभवाच्या खाईत लोटले.

कॅन्टोन्मेटची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. मात्र, जनमत विरोधात जाईल, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होईल हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऐनवेळी सर्व कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका स्थगित केल्या तेथील जनतेचा लोकशाहीत जगण्याचा हक्क काढून घेतला, असेही जोशी म्हणाले. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका याच पद्धतीने थांबविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने तातडीने सर्व कॅन्टोन्मेंटमध्ये आधी जाहीर झाल्या त्याप्रमाणे निवडणुका घ्यावात, अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण