शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पराभवाच्या भीतीमुळेच भाजपची कॅन्टोन्मेंट निवडणुकीला स्थगिती; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:11 IST

देशातील महागाईवर उपाय करायचा सोडून मोठ-मोठ्या उद्योगपतींना थेट केंद्रांकडून अभय दिलं जातय

पुणे : देशभरात भाजपविरोधी जनमत तयार होत आहे. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने केंद्र सरकारने देशातील सर्व कॅन्टोन्मेटच्या (छावणी मंडळ) निवडणुकांना स्थगिती दिली आहे, अशी टीका काँग्रेसने केली. लोकशाहीत जगण्याचा तेथील नागरिकांचा हक्कच केंद्र सरकार काढून घेत असून, अशीच स्थिती देशातील सर्वच जनतेवर येऊ शकते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, देशात सर्वत्र महागाई वाढली आहे. केंद्र सरकार त्यावर काहीच उपाय करायला तयार नाही, त्याऐवजी मोठ-मोठ्या उद्योगपतींना थेट केंद्रांकडून अभय दिले जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा बेसुमार वापर सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या केंद्र सरकारविषयी लाेकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसते. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला हे त्याचेच द्योतक आहे. त्याआधी दिल्ली, पंजाब या राज्यांमधील जनतेनेही त्यांना पराभवाच्या खाईत लोटले.

कॅन्टोन्मेटची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. मात्र, जनमत विरोधात जाईल, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होईल हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऐनवेळी सर्व कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका स्थगित केल्या तेथील जनतेचा लोकशाहीत जगण्याचा हक्क काढून घेतला, असेही जोशी म्हणाले. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका याच पद्धतीने थांबविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने तातडीने सर्व कॅन्टोन्मेंटमध्ये आधी जाहीर झाल्या त्याप्रमाणे निवडणुका घ्यावात, अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण