शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला

By राजू इनामदार | Updated: November 18, 2024 13:49 IST

भाजपने २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते, पण ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली

पुणे: निवडणूका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष देश तोडण्याचे काम करत आहे असा हल्ला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षावर चढवला. याचा प्रतिकार सर्वांना एकत्र राहूनच करावा लागेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रेड्डी यांची काँग्रेस भवनमध्ये सोमवारी सकाळी पत्रकार परिषद झाली. 

रेड्डी म्हणाले, " भाजप मागील ११ वर्षे सत्तेत आहे. या काळात काय केले ते त्यांनी सांगावे. महाराष्ट्रात सत्ता आल्यावर काय करणार ते सांगावे. पण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली. देशात असंतोष निर्माण करणारा नागरिकत्व कायदा त्यांनी केला. त्यांच्याच सत्ताकाळात शेतकर्यांचे ११ महिन्यांचे आंदोलन झाले. सरकारने लक्ष न दिल्याने त्या आंदोलनात ७०० शेतकरी म्रुत्यूमुखी पडले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण इथल्या प्रचारात ते त्याविषयी काहीच बोलत नाहीत."

प्रत्येक निवडणूकीत ते जिंकण्यासाठी म्हणून हिंदु मुस्लिम, हिंदु ख्रिश्चन असा प्रचार करून देश तोडण्याची भाषा करत असतात. हिमाचल प्रदेशमध्ये ९५ टक्के हिंदुच आहेत, पण त्यांनी काँग्रेसला मतदान केले. त्यामुळेच असा प्रचार करणे अयोग्य आहे,मात्र सांगावे असे दुसरे काहीच नसल्याने ते हाच प्रचार सर्व निवडणूकांमध्ये करतात असे रेड्डी म्हणाले.

केंद्र सरकारने १६ लाख कोटीची कर्ज माफ केली. त्यामुळे सामान्यांना काही देणाऱ्या योजना जाहीर होत असतील तर ते चांगलेच आहे असे मत रेड्डी यांनी.व्यक्त केले. शेवटी हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडेच येणार आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४TelanganaतेलंगणाBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र