शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला

By राजू इनामदार | Updated: November 18, 2024 13:49 IST

भाजपने २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते, पण ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली

पुणे: निवडणूका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष देश तोडण्याचे काम करत आहे असा हल्ला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षावर चढवला. याचा प्रतिकार सर्वांना एकत्र राहूनच करावा लागेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रेड्डी यांची काँग्रेस भवनमध्ये सोमवारी सकाळी पत्रकार परिषद झाली. 

रेड्डी म्हणाले, " भाजप मागील ११ वर्षे सत्तेत आहे. या काळात काय केले ते त्यांनी सांगावे. महाराष्ट्रात सत्ता आल्यावर काय करणार ते सांगावे. पण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली. देशात असंतोष निर्माण करणारा नागरिकत्व कायदा त्यांनी केला. त्यांच्याच सत्ताकाळात शेतकर्यांचे ११ महिन्यांचे आंदोलन झाले. सरकारने लक्ष न दिल्याने त्या आंदोलनात ७०० शेतकरी म्रुत्यूमुखी पडले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण इथल्या प्रचारात ते त्याविषयी काहीच बोलत नाहीत."

प्रत्येक निवडणूकीत ते जिंकण्यासाठी म्हणून हिंदु मुस्लिम, हिंदु ख्रिश्चन असा प्रचार करून देश तोडण्याची भाषा करत असतात. हिमाचल प्रदेशमध्ये ९५ टक्के हिंदुच आहेत, पण त्यांनी काँग्रेसला मतदान केले. त्यामुळेच असा प्रचार करणे अयोग्य आहे,मात्र सांगावे असे दुसरे काहीच नसल्याने ते हाच प्रचार सर्व निवडणूकांमध्ये करतात असे रेड्डी म्हणाले.

केंद्र सरकारने १६ लाख कोटीची कर्ज माफ केली. त्यामुळे सामान्यांना काही देणाऱ्या योजना जाहीर होत असतील तर ते चांगलेच आहे असे मत रेड्डी यांनी.व्यक्त केले. शेवटी हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडेच येणार आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४TelanganaतेलंगणाBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र