शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला

By राजू इनामदार | Updated: November 18, 2024 13:49 IST

भाजपने २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते, पण ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली

पुणे: निवडणूका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष देश तोडण्याचे काम करत आहे असा हल्ला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षावर चढवला. याचा प्रतिकार सर्वांना एकत्र राहूनच करावा लागेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रेड्डी यांची काँग्रेस भवनमध्ये सोमवारी सकाळी पत्रकार परिषद झाली. 

रेड्डी म्हणाले, " भाजप मागील ११ वर्षे सत्तेत आहे. या काळात काय केले ते त्यांनी सांगावे. महाराष्ट्रात सत्ता आल्यावर काय करणार ते सांगावे. पण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली. देशात असंतोष निर्माण करणारा नागरिकत्व कायदा त्यांनी केला. त्यांच्याच सत्ताकाळात शेतकर्यांचे ११ महिन्यांचे आंदोलन झाले. सरकारने लक्ष न दिल्याने त्या आंदोलनात ७०० शेतकरी म्रुत्यूमुखी पडले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण इथल्या प्रचारात ते त्याविषयी काहीच बोलत नाहीत."

प्रत्येक निवडणूकीत ते जिंकण्यासाठी म्हणून हिंदु मुस्लिम, हिंदु ख्रिश्चन असा प्रचार करून देश तोडण्याची भाषा करत असतात. हिमाचल प्रदेशमध्ये ९५ टक्के हिंदुच आहेत, पण त्यांनी काँग्रेसला मतदान केले. त्यामुळेच असा प्रचार करणे अयोग्य आहे,मात्र सांगावे असे दुसरे काहीच नसल्याने ते हाच प्रचार सर्व निवडणूकांमध्ये करतात असे रेड्डी म्हणाले.

केंद्र सरकारने १६ लाख कोटीची कर्ज माफ केली. त्यामुळे सामान्यांना काही देणाऱ्या योजना जाहीर होत असतील तर ते चांगलेच आहे असे मत रेड्डी यांनी.व्यक्त केले. शेवटी हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडेच येणार आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४TelanganaतेलंगणाBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र