शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

भाजप पुढील ३० वर्षे सत्तेत; एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, अब्दुल सत्तारांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:56 IST

लोक अमित शाह यांच्या पाठीशी असल्याने पुढील ३० वर्षे भाजप सत्तेत राहणार 

पुणे :  लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. महायुतीकडून तर जागावाटपही सुरु झाले आहे. तर काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रेमार्फत जोरदार तयारी सुरु आहे. अशातच विधानसभेबाबतही चर्चाना उधाण आलंय. महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावे महायुतीकडून चर्चेत आली आहेत. अशातच अमित शाह यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्रातील महायुतीची ताकद वाढल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला असून पुढील ३० वर्षे केंद्रात भाजपची सत्ता राहील यादृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. त्यानंतर महायुतीच्या राजकीय नेत्यांमध्ये जिंकण्याबाबतचा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसू लागले आहे. अशातच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी पुढील 30 वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा केला आहे. ते पुण्यात बोलत होते. 

अब्दुल सत्तार म्हणाले, अमित शाह यांचे बोलणे योग्य असून, देशात लोकशाही आहे. जोपर्यंत लोक एखाद्या नेत्याच्या पाठीशी आहेत आणि ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतात आणि तो पक्ष सत्तेत राहतो. त्यामुळे भाजप पुढील 30 वर्षे सतत राहणार आणि त्यांच्या सोबत आम्ही सत्तेत असणार आहे. त्यामुळे आमचा फायदा होणार असून, पुढील 30 वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा सत्तार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहBJPभाजपा