शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:14 IST

राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही.

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून राज्यातील हजारो लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. याबाबत विमा कंपनीकडून संबंधित सर्व जिल्हाधिकाºयांना लेखी पत्र दिले असून, मार्च २०१८ नंतर योजनेसाठीचे प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, याबाबत शासनस्तरावर नक्की योजनेचे काय झाले, योजना दुसऱ्या योजनेत समाविष्ट केली का याबाबत कोणताही पत्रव्यवहार शासनाकडून करण्यात आलेला नाही. शासनाची उदासीनता आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी आणि लाभार्थी कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारी आम आदमी विमा योजना आहे. या योजनेसाठी १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारे कुटुंबप्रमुखाचा या योजनेत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरविला जातो. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी शंभर रुपये वार्षिक विमा हप्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरले जातात.

पुण्यातील ९९ प्रस्ताव प्रलंबित

विमा मुदतीत लाभार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून कुटुंबाला ३० हजार रुपये दिले जातात. तर अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये भरपाई मिळते. मात्र, भाजप सरकारने प्रिमियमची रक्कमच विमा कंपनीला दिलेली नाही. त्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाने जिल्हाधिकारी पुणे यांना लेखी पत्र देऊन आम आदमी विमा योजनेसाठी १ मार्च २०१८ नंतर मृत्यू झालेल्या व्यक्तींचे प्रस्ताव पाठवू नये असे म्हटले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे ९९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपा