शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:14 IST

राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही.

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून राज्यातील हजारो लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. याबाबत विमा कंपनीकडून संबंधित सर्व जिल्हाधिकाºयांना लेखी पत्र दिले असून, मार्च २०१८ नंतर योजनेसाठीचे प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, याबाबत शासनस्तरावर नक्की योजनेचे काय झाले, योजना दुसऱ्या योजनेत समाविष्ट केली का याबाबत कोणताही पत्रव्यवहार शासनाकडून करण्यात आलेला नाही. शासनाची उदासीनता आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी आणि लाभार्थी कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारी आम आदमी विमा योजना आहे. या योजनेसाठी १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारे कुटुंबप्रमुखाचा या योजनेत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरविला जातो. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी शंभर रुपये वार्षिक विमा हप्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरले जातात.

पुण्यातील ९९ प्रस्ताव प्रलंबित

विमा मुदतीत लाभार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून कुटुंबाला ३० हजार रुपये दिले जातात. तर अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये भरपाई मिळते. मात्र, भाजप सरकारने प्रिमियमची रक्कमच विमा कंपनीला दिलेली नाही. त्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाने जिल्हाधिकारी पुणे यांना लेखी पत्र देऊन आम आदमी विमा योजनेसाठी १ मार्च २०१८ नंतर मृत्यू झालेल्या व्यक्तींचे प्रस्ताव पाठवू नये असे म्हटले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे ९९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपा