शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही; आमदार रोहित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 11:28 IST

मंचर (पुणे) : जे विचारांना बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप ...

मंचर (पुणे) : जे विचारांना बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप सोडून इतर पक्षात आहेत. भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. बाळहिरडा प्रश्नावरून त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.

रोहित पवार मंचर येथे आले असता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता पवार म्हणाले, भाजपकडे सत्ता तसेच पैसा आहे. दबावामुळे काही नेते भाजपत गेले आहेत. पुढील काळात काही नेते तसेच आमदार भाजपत जातील, असे बोलले जाते. विचारांना जे बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपत जात आहेत, असे सांगून पवार म्हणाले, अनेक लोकांशी संपर्क केला जाईल. मात्र, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जे बांधील आहेत ते आहे तिथेच राहतील. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप सोडून इतर पक्षात आहेत.

भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही असे सांगून ते म्हणाले, आम्ही आमच्या पातळीवर लढत राहू. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर आज जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत. खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ही केवळ चर्चा असून लोकांमध्ये अशा चर्चा कोण घडवून आणतो ते आपल्याला माहिती आहे. भाजपच राजकीय पुड्या सोडत असते. अमोल कोल्हे यांच्याबाबत या हवेतील गप्पा सुरू आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल अशीसुद्धा चर्चा सुरू आहे, असे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBJPभाजपाcongressकाँग्रेस