शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
5
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
6
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
7
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
8
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
9
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
10
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
11
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
12
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
13
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
14
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
15
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
16
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
17
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
18
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
19
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
20
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?

नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा

By राजू इनामदार | Updated: April 21, 2025 16:03 IST

देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरण बाहेर आणून गांधी परिवाराची बदनामी केली

पुणे: भारतीय जनता प्रणित केंद्र सरकारला काहीही करून नेहरू - गांधी परिवाराची बदनामी करायची आहे, त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’चे प्रकरण त्याचाच एक भाग आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव गौडा यांनी केली. देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसभवनमध्ये गौडा यांनी सोमवारी (दि.२१) पत्रकारांबरोबर या विषयावर संवाद साधला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश पदाधिकारी ॲड. भाऊसाहेब आजबे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गौडा म्हणाले, “नॅशनल हेरॉल्ड हे असे प्रकरण आहे की ज्यात पैशांची कसलीही देवाणघेवाण झालेली नाही. जे काही आहे ते सगळे कागदोपत्री व कायदेशीर आहे. कुठेही कायद्याचा भंग केलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकार सक्त वसुली संचलनालय सारख्या सरकारी यंत्रणेचा वापर करून नेहरू-गांधी परिवाराची बदनामी करण्यासाठीच हे करत आहे.”

नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र पंडित नेहरू यांनी सुरू केले. त्यात त्यांची गुंतवणूक होती. स्वातंत्र्य चळवळीत हे वृत्तपत्र देशातील जनतेचा आवाज झाले होते. त्यामुळेच ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली. पुढे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची स्थापना झाली. त्यात काँग्रेस पक्षाचा सहभाग आला. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्र चालेनासे झाले. त्यामुळे त्याला आर्थिक स्थिरता येण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन देण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी मदत केली. हा देखील संपूर्ण व्यवहार कायदेशीरच आहे. हे सर्व कायद्यानेच सिद्ध होईल, मात्र तरीही ‘इडी’चे अधिकारी सरकारच्या दबावातून गांधी परिवाराच्या विरोधात कारवाई करत आहेत असे गौडा म्हणाले.

देशासमोर सध्या अनेक समस्या आहेत. मणीपूर जळत होते, बेरोजगारी वाढली आहे, अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नितीमुळे भारतासमोरही धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सरकारने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे अशी टीका गौडा यांनी केली. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे, याचेही भान सरकारला राहिलेले नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाजपचे पुर्वज कधीही नव्हते. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व खुणा पुसायच्या आहेत, असा आरोप गौडा यांनी केला.

नॉन्सेन्स लोक

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मुंबई हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता, असा आरोप केला आहे. याबाबत विचारले असता गौडा यांनी त्यांची खिल्ली उडवली. भांडारी तसेच सर्वोच्च न्यायालयावर टीका करणारे त्यांचे खासदार हे भाजपमधील नॉन्सेन्स लोक आहेत, त्यांची वक्तव्येही तशीच आहेत असे ते म्हणाले. मुंबई हल्ल्याचा खटला लढवणारे उज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांच्याकडून भंडारी यांनी माहिती घ्यावी, असे यावेळी गोपाळ तिवारी यांनी सुचवले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारRahul Gandhiराहुल गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू