शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा

By राजू इनामदार | Updated: April 21, 2025 16:03 IST

देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरण बाहेर आणून गांधी परिवाराची बदनामी केली

पुणे: भारतीय जनता प्रणित केंद्र सरकारला काहीही करून नेहरू - गांधी परिवाराची बदनामी करायची आहे, त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’चे प्रकरण त्याचाच एक भाग आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव गौडा यांनी केली. देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसभवनमध्ये गौडा यांनी सोमवारी (दि.२१) पत्रकारांबरोबर या विषयावर संवाद साधला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश पदाधिकारी ॲड. भाऊसाहेब आजबे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गौडा म्हणाले, “नॅशनल हेरॉल्ड हे असे प्रकरण आहे की ज्यात पैशांची कसलीही देवाणघेवाण झालेली नाही. जे काही आहे ते सगळे कागदोपत्री व कायदेशीर आहे. कुठेही कायद्याचा भंग केलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकार सक्त वसुली संचलनालय सारख्या सरकारी यंत्रणेचा वापर करून नेहरू-गांधी परिवाराची बदनामी करण्यासाठीच हे करत आहे.”

नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र पंडित नेहरू यांनी सुरू केले. त्यात त्यांची गुंतवणूक होती. स्वातंत्र्य चळवळीत हे वृत्तपत्र देशातील जनतेचा आवाज झाले होते. त्यामुळेच ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली. पुढे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची स्थापना झाली. त्यात काँग्रेस पक्षाचा सहभाग आला. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्र चालेनासे झाले. त्यामुळे त्याला आर्थिक स्थिरता येण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन देण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी मदत केली. हा देखील संपूर्ण व्यवहार कायदेशीरच आहे. हे सर्व कायद्यानेच सिद्ध होईल, मात्र तरीही ‘इडी’चे अधिकारी सरकारच्या दबावातून गांधी परिवाराच्या विरोधात कारवाई करत आहेत असे गौडा म्हणाले.

देशासमोर सध्या अनेक समस्या आहेत. मणीपूर जळत होते, बेरोजगारी वाढली आहे, अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नितीमुळे भारतासमोरही धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सरकारने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे अशी टीका गौडा यांनी केली. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे, याचेही भान सरकारला राहिलेले नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाजपचे पुर्वज कधीही नव्हते. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य चळवळीच्या सर्व खुणा पुसायच्या आहेत, असा आरोप गौडा यांनी केला.

नॉन्सेन्स लोक

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मुंबई हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात होता, असा आरोप केला आहे. याबाबत विचारले असता गौडा यांनी त्यांची खिल्ली उडवली. भांडारी तसेच सर्वोच्च न्यायालयावर टीका करणारे त्यांचे खासदार हे भाजपमधील नॉन्सेन्स लोक आहेत, त्यांची वक्तव्येही तशीच आहेत असे ते म्हणाले. मुंबई हल्ल्याचा खटला लढवणारे उज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांच्याकडून भंडारी यांनी माहिती घ्यावी, असे यावेळी गोपाळ तिवारी यांनी सुचवले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारRahul Gandhiराहुल गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू