शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जीव आणि रसायन ही शास्त्रे एकत्र आणावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST

राहुल शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये संशोधनासाठी त्यांच्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे ...

राहुल शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये संशोधनासाठी त्यांच्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे पाच ते सहा टक्के निधी संशोधनावर खर्च केला जातो. मात्र, भारतात हा खर्च दोन टक्‍क्‍यांपर्यंत होताना दिसतो. भारताला प्रगत देश म्हणून जगासमोर यायचे असेल तर आपल्याला संशोधनावरील खर्च वाढवावा लागेल. तसेच देशातंर्गत संशोधन संस्थांना अधिक सक्षम करावे लागेल,” असे मत डॉ. आशिष लेले यांनी व्यक्त केले. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणल्यास त्याला खूप मोठे भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) नवनियुक्त संचालक म्हणून डॉ. आशिष लेले यांनी नुकताच पदभार स्विकारला. या निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. एनसीएलच्या पुढील वाटचालीबद्दल यावेळी डॉ. लेले यांनी चर्चा केली.

डॉ. लेले म्हणाले की, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणावे लागणार आहे. एनसीएलमध्ये आवश्यक मनुष्यबळ, शास्त्रज्ञ आणि उत्तम प्रयोगशाळा आहेत. फाईन आणि स्पेशलिटी केमिकल इंडस्ट्री ही भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या इंडस्ट्रीत वापरले जाणारे तंत्रज्ञान खूप जुने झाले आहे. त्यात अनेक दोष असून त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान बदलून सुधारित चांगले आणि स्वस्त तंत्रज्ञान आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच ‘क्लीन एनर्जी’ या क्षेत्रात भारताला प्रचंड काम करायचे आहे. भारताने कोरोनावर लस निर्माण करून जगभर त्याची निर्यात केली. त्याच पद्धतीने क्लीन एनर्जीची निर्मिती करून आपण जगाला पुरवठा करू करू शकतो.

“हायड्रोजन एनर्जीचे इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पावर मी काम केलेले आहे. त्यातून खूप शिकायला मिळाले,” असे डॉ. लेले म्हणाले. त्यांनी सांगितले की, भारतासह परदेशात कोरोनामुळे प्रदूषणाची पातळी प्रचंड खाली आली. मुंबईत कधीही आकाश निरभ्र दिसले नाही. मात्र टाळेबंदीमुळे प्रदूषण कमी झाले आणि हे दुर्मिळ दृश्य पाहता आले. पंजाबमधून हिमालय दिसल्याच्या घटना समोर आल्या. जगभरात असे चित्र होते. एकूणच क्लीन एनर्जीमुळे प्रदूषण कमी होते हे सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सौर उर्जा, पवन उर्जा याला अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते.”

चौकट

उद्यावर नजर

“शास्त्रज्ञ असल्यामुळे पुढे काय होईल, याचा विचार आम्ही करत असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह विविध क्षेत्रात पुढील पाच-दहा वर्षात जे तंत्रज्ञान येईल आणि ज्याचा वापर होईल, त्यावरच संशोधन करावे लागेल. त्यासाठी लागणारे संशोधक, निधी पायाभूत सुविधा, हे सर्व उभारण्यासाठी एनसीएलच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,” असे डॉ. आशिष लेले यांनी स्पष्ट केले.

चौकट

कोरोनाने पटवून दिले महत्त्व

“कोरोना काळात जगाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व पुन्हा एकदा समजले. या काळात पहिल्यांदाच असे घडले की एका वर्षातच अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून एक नव्हे तर चार लशी तयार झाल्या. एका वर्षात असे घडल्याचे उदाहरण इतिहासात नाही. कोरोना काळात विज्ञान-तंत्रज्ञानाने दिलेल्या लढ्याला खूप मोठे महत्त्व आहे. आपल्या तरुण पिढीच्याही हे लक्षात आलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांना समजले आहे. त्यामुळे तरुण पिढी विज्ञान क्षेत्रात करिअरसाठी पुढे येईल अशी अपेक्षा आहे.”

-डॉ. आशिष लेले, संचालक, एनसीएल

-------