शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त : धरणग्रस्तांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:24 IST

भामा आसखेड धरणातून पाण्याचे आवर्तन का सोडले? हे विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त १९ शेतकऱ्यांसह अनोळखी १०० जणांवर गेल्या शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘गुन्हे मागे घ्या, नाही तर आम्हाला अटक करा,’ अशी जोरदार मागणी करीत धरणग्रस्त शेतकºयांनी चाकण पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करीत ठिय्या आंदोलन केले.

आंबेठाण - भामा आसखेड धरणातून पाण्याचे आवर्तन का सोडले? हे विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त १९ शेतकऱ्यांसह अनोळखी १०० जणांवर गेल्या शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘गुन्हे मागे घ्या, नाही तर आम्हाला अटक करा,’ अशी जोरदार मागणी करीत धरणग्रस्त शेतकºयांनी चाकण पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करीत ठिय्या आंदोलन केले.यावेळी झालेल्या बैठकीत शेकडो धरणग्रस्त शेतकºयांसह भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास सांडभोर, अनिल राक्षे, काँगे्रसचे पंचायत समिती उपसभापती अमोल पवार, आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार: चाकण पोलिसांनी सात एप्रिलला १९ आंदोलकांसह अन्य जवळपास ८० ते १०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘आमच्यावर दाखल करण्यात आलेले हे खोटे गुन्हे आहेत, आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीसाठी आणि पाण्यासाठी भांडत आहोत. ज्या अधिका-यांनी तक्रार दिली त्यांना आम्ही त्रास दिला नाही. ते आम्हाला ओळखतदेखील नाहीत. आजवर आम्ही प्रशासनाला वेठीस धरले नसून सहकार्य केले आहे. आम्ही केवळ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आंदोलन करीत आहोत. आम्ही आंदोलक लाभक्षेत्राच्या नागरिकांच्या विरोधात नाही. उद्या आम्हाला आणि तुम्हाला पाणी राहणार नाही,’ असे आंदोलकांच्या वतीने देविदास बांदल आणि सत्यवान नवले यांनी बोलताना सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी आपल्या न्याय्य-हक्कासाठी लढा देत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत आहोत. आमचे पुनर्वसन व्हावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जारी केला आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन हवी आहे. याकरिता हे आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आपल्या ताकदीवर उभे केले आहे. तालुक्यातील एकही राजकीय नेता आजपर्यंत या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. परंतु, शेतकºयांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे धरणग्रस्त शेतकºयांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अनिल राक्षे, धैर्यशील पानसरे, राहुल नायकवाडी, राम गोरे, रवींद्र गाढवे, अमोल पानमंद, मनोज खांडेभराड, कामरुद्दीन शेख, भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, चांगदेव शिवेकर, सरपंच दत्ता मांडेकर, काँग्रेसचे पंचायत समिती उपसभापती अमोल पवार, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव; तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते; मात्र शिवसेनेचे जबाबदार नेते या बैठकीकडे फिरकलेसुद्धा नाहीत. तसेच धरणग्रस्त शेतकरी सत्यवान नवले, देविदास बांदल, बळवंत डांगले, बन्सु होले, सखुबाई चांभारे, किसन नवले आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी आंदोलक आणि सर्वपक्षीय नेते यांच्याशी चर्चा केली आणि प्रशासनाची सहकार्याची भावना असून जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, असे सांगितले. फक्त आंदोलन सनदशीर मार्गाने करावे. कायदा हातात घेऊन नये, अशी विनंतीवजा सूचना त्यांनी केली. जबाबदार अधिकाºयाने दिलेली खोटी तक्रार पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून रद्द करावी आणि शेतकºयांची पिळवणूक आणि बदनामी करणाºया अधिकाºयावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी चाकण पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली.मयत धरणग्रस्त शेतक-यावर गुन्हा दाखलनामदेव बाळा बांदल यांचे ८ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे; मात्र, भामा आसखेडचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकण पोलिसांनी नामदेव बाळा बांदल या मयत धरणग्रस्त शेतक-यावर गुन्हा दाखल केला असल्याचे आज उपस्थित शेतक-यांनी सांगितले.मृत धरणग्रस्त शेतक-यांवर गुन्हाआसखेड: भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी लढा सुरू असताना धरण कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता सह कर्मचाºयांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सुमारे १०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, यात आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या एका प्रकल्पग्रस्त शेतकºयावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नामदेव बाळा बांदल असे मृत; तसेच गुन्हा दाखल झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकºयाचे नाव आहे. त्यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. यावर पोलीस निरीक्षक मनोज यादव म्हणाले की, नामदेव बांदल हे मृत असल्याचे समजते; परंतू याला जबाबदार फिर्यादी आहे. आमच्याकडे आलेल्या नावांच्या तपासात या काही बाबी आढळून आल्या आहेत. गावात एकाच नावाचे दोन व्यक्तीपणआहेत त्यातील योग्य व्यक्तींचा तपास सुरू आहे. धरणप्रशासनाचे सर्जेराव मेमाणे (फिर्यादी) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई