शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कुरकुंभचे पाणी बारामती-पुरंदरला मिळणार  : पाटबंधारेचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 07:00 IST

राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या निर्णयाची २६ वर्षानंतर अंमलबजावणीखडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा

- विशाल शिर्के पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला या पुढे उजनी धरणातून पाणी घ्यावे लागणार आहे. राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती. शेतकऱ्यांनी ही बाब पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिल्यावर खडकवासला अभियंत्यांना त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे मंडळाने दिले आहेत. त्यामुळे कुरकुंभचेपाणी बारामती-पुरंदरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे बारामती, शिरुर आणि पुरंदर या भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. जनाई-शिरसाई योजने अंतर्गत बारामती परिसराला योग्य पाणी मिळावे अशी याचिका बारामतीमधील शेतकरी विठ्ठल जराड आणि इतर पाच शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. त्याच्या सुनावणीत विवरण अधिकाऱ्यांनी जनाई-शिरसाई योजनेला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा संपूर्ण लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  दरम्यान, जनाई शिरसाई योजनेतून बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी ३.६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला उजनी धरणातून पाणी देण्याचे आदेश राज्यसरकारने ९ सप्टेंबर १९९३ रोजी दिले होते. मात्र, अजूनही त्यांना, खडकवासला धरणाच्या काल्यव्यातूनच पाणी दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी पाटबंधारे मंडळाच्या लक्षात आणून दिले. तसेच, हे पाणी बंद करुन ठरल्याप्रमाणे आम्हाला पाणी द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जनाई शिरसाई योजनेच्या लाभधारकांनी त्याबाबतचा शासकीय निर्णय २७ मे रोजी लक्षात आणून दिला. त्याची तातडीने दखल घेत पाटबंधारे मंडळाने या निर्णयाच्या अमंलबजावणीचे आदेश दिले आहेत. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा प्रणालीतून पाणी दिले जाते. जनाई-शिरसाईच्या अवर्षणग्रस्त भागाला पाणी उपलब्ध होण्यासाठी यानंतरची कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची गरज उजनी जलाशयातून भागविण्यात यावी. संबंधित संस्थेस एक महिन्याची नोटीस देऊन ही बाब लक्षात आणून द्यावी. त्यानंतर संबंधित संस्थेचा पाणी वापर उजनी धरणातून करण्याचे निर्देश द्यावेत असे आदेश पुणे पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता नं. व्यं. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. २८) दिले आहेत.खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा आहे. जनाई योजने अंतर्गत तीन टप्प्यात बारामती आणि पुरंदरला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तर, शिरसाई योजनेचा एक टप्पा बारामती व दौंड तालुक्यातील सिंचनासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

टॅग्स :KurkumbhकुरकुंभWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती