शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बारामती लोकसभेची निवडणूक पवार विरुद्ध सुळे; पवारच जिंकणार, सुनील तटकरेंचा दावा

By राजू हिंगे | Updated: May 9, 2024 20:23 IST

महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील

पुणे: बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी नसून पवार विरुद्ध सुळे अशी आहे. सुनेत्रा पवार याच निवडून येणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने पैसे वाटप केले, असे म्हणणे हास्यास्पद असुन एक प्रकारे पराभवाची कबुली दिली, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर, प्रसिध्दी सहप्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.सुनील तटकरे म्हणाले, " बारामती लोकसभा निवडणुकीवेळी माझी ही निवडणूक होती. त्यामुळे मी इकडे आलो नाही. अजित पवार स्वतः सक्षम आहेत, त्यांनीच यापूर्वीच्या निवडणुका जिंकून दिल्या आहेत. बारामतीचा अजित पवार यांना चांगला अभ्यास आहे. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लक्ष घातले होते. बारामती निवडणुकीनंतर आढावा घेतला. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तटकरे म्हणाले, " आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतः त्याविषयी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य नाही. रुपाली चाकणकर यांनी भावनेच्या भरात ईव्हीएम मशीन पूजा केलेली असू शकते, त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्यांनी केलेली चूक ही चूकच आहे. महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील असेही तटकरे यांनी सांगितले.

भाजपबरोबर सत्ता स्थापनेचा तीन वेळा निर्णय झाला होता. 2014 आणि 2016 मध्ये शिवसेना हा सत्तेमध्ये सहभागी असेल. शिवसेना आमचा जुना मित्र असल्यामुळे त्यांच्याबरोबरची युती तोडणार नाही असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. 2019 ला ही बोलणी झाली होती. नंतर शिवसेनेसोबत सत्ते जाण्याचा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही भाजप सोबत जाण्याची चर्चा झाली होती असे असताना देखील जाणीवपूर्वक आता निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे .भाजपसोबत जायला हवा असं राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रत्येक आमदारांनी सह्या करून पत्र दिले होते. मात्र आता त्यातीलच काही पत्रकार परिषदा घेऊन संभ्रम निर्माण करत आहे . त्यामुळे अन्य कारणासाठी पक्षातून बाहेर पडले असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही असेही तटकरे यांनी सांगितले.

राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाची राज्यघटना बदलली जाईल असे आरेाप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व आहे. 370 कलम, सीएए कायदा आदिविषयी अल्पसंख्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, पण तो आम्ही दुर करीत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेsunil tatkareसुनील तटकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४baramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४