शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:23 IST

बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निश्चित केलेले २०४७ चे विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राला मोठे योगदान द्यावे लागेल. आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरण शाश्वतता आणि उत्तम प्रशासन हे विकसित भारताचे महत्त्वाचे घटक आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँका आपल्या माध्यमातून गती देऊ शकतील, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी व्यक्त केले. पुण्यात स्थापन झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना उपस्थित होते.

सीतारामन म्हणाल्या, पायाभूत सुविधांचा विकास व विस्तार, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) गरजेनुसार वित्तपुरवठा करणे, अद्यापही बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांनाही बँकिंगच्या जाळ्यात आणणे आणि सर्व नागरिकांना विमा कवच पुरवण्यावर भर देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेचे चित्र बदलत आहे. याद्वारे ग्राहकांना सुरक्षित, सुलभ डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळत आहे. या यंत्रणा अधिक भक्कम व सुलभ आणि विश्वसनीय बनविणे गरजेचे आहे. मात्र, असे करतानाच बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पुरेशी भक्कम सुरक्षाप्रणाली विकसित करायला हवी. डिजिटल यंत्रणेवरील हल्ल्यासारखे प्रसंग घडल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे, याचा सरावही बँकांनी करणे आवश्यक आहे.

बँकांनी ग्राहककेंद्रित यंत्रणा आणि प्रणाली विकसित करून ग्राहकांना अधिकाधिक समाधान मिळावे, यावर भर द्यावा, तसेच भविष्यातील विकासासाठी आवश्यक गरजा लक्षात घेता बँकांनी भांडवलवृद्धी करण्यावर भर द्यावा, असे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी सांगितले.येत्या पाच वर्षांत आणखी एक हजार शाखा सुरू करण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. ग्राहकाभिमुख सेवा नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा यावर बँकेचा भर राहील, असे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbankबँकNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMONEYपैसाInvestmentगुंतवणूकdigitalडिजिटल