शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

बंडातात्या कराडकरांची जीभ घसरली! म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींचा अहिंसा मार्ग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:02 IST

स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली

राजगुरुनगर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथे २३ मार्च या शहिददिनी आळंदी ते राजगुरुनगर येथे राज्य व्यसनमुक्त युवक संघाची भक्तीपीठ ते क्रांतीपीठ पदयात्रा घेऊन बंडातात्या कराडकर येथे आले होते. यावेळी भाषणात कराडकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे.

''स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. भारताला १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे अहींसेद्वारे मिळाले नसून सशस्त्र क्रांतिकारकांच्या कष्टातून मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.''  कराडकर म्हणाले,  हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव हे देशाच्या तीन वेगळ्या प्रांतातील तरुण एका समान धाग्याने एकत्र आले. तो म्हणजे स्वातंत्र्य. परंतु हे स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली. तो वणवा देशभर पेटला. आणी म्हणून ब्रिटीशांना येथून काढता पाय घ्यावा लागला.

साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीने मिळाले स्वातंत्र्य 

भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या अहिंसेच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947 साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942 ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया त्यामधून पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की 'साबरमती के संत तुने कर किया कमाल, असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असं कराडकर म्हणाले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKhedखेडBhagat SinghभगतसिंगIndiaभारत