शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:59 IST

पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा...

पुणे : दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्या आहेत. पण तेथील अनेक सोयी-सुविधा बंद आहेत. त्या सुरू होणे आवश्यक आहे. शाळांमधील सीसीटीव्ही बंद पडले असून, त्यामुळे शाळेत कोण ये-जा करतो, ते समजत नाही. परिणामी अनुचित प्रकार घडू शकतात. नुकताच एका शाळेत तसा प्रकार घडला आहे. त्यामुळे शाळांनी पुन्हा आपल्या सर्व सोयीसुविधा सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जर सीसीटीव्ही बंद असतील, तर मुली असुरक्षित होणार आहेत.

शहरात कब्बडी खेळाडू मुलीचा झालेला खून, दहावीतील मुलीवर केलेला प्राणघातक हल्ला या घटना ताज्या आहेत. त्यातच शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेतील मुलीवर शाळेच्या आवारात येऊन एका अनोळखी व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली. परिणामी शाळा-महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा.

शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. आपली मुले सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत,याची पालकांना खात्री वाटायला हवी. त्यामुळे सर्व शिक्षण संस्थांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालक शिक्षक संघ,माता पालक संघ, परिवहन समिती, सुरक्षा विषयक समिती स्थापन करून त्या कार्यन्वित करायला हव्यात. मात्र,बहुतांश शाळांमध्ये एकही समिती नसल्याचे दिसले.

ओरडतील म्हणून गप्प बसू नका

अत्याचाराच्या दररोज ऐकायला मिळणाऱ्या घटना धडकी भरवतात. मुलींच्या पालकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. मात्र, पालकांनी घाबरून न जाता अथवा मुलींवर अनावश्यक बंधने न लादता त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज असते. बरेचदा पालक आपल्यालाच ओरडतील, या भीतीने मुली घरी कोणतीच गोष्ट सांगत नाहीत. ही ‘कम्युनिकेशन गॅप’ भरून निघायला हवी. मला दोन मुली आहेत. एक नववीत, तर दुसरी सहावीत शिकत आहे. लहानपणापासून आम्ही दोघांनी त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवले आहे. काहीही घडले तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण झाल्यास ती आपल्याशी खुलेपणाने बोलू शकतात. मुलांना लैैंगिक शिक्षण देण्याची सुरुवातही घरापासूनच व्हायला हवी.

- निकिता लिमये, पालक

कोरोनामुळे शाळास्तरावरील अनेक गोष्टी कार्यान्वित झाल्या नाहीत. गवत वाढल्याने व कचरा साचल्याने काही शाळा अस्वच्छ आहेत. ग्रंथालय व प्रयोगशाळांची दुरवस्था झाली असून, काही स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी लवकर सर्व गोष्टी नीटनेटक्या कराव्यात. त्याचप्रमाणे पीटीए, माता पालक संघ, परिवहन समित्यांची स्थापना करावी.

- औदुंबर उकिरडे,शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग

पुण्यातील एका नामांकित शाळेत मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यावेळी शाळेची सुरक्षा यंत्रणा काय करीत होती? या अत्याचारी कृत्याचा आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणाऱ्या शाळा प्रशासनाचा तीव्र निषेध. शाळेत सातत्याने घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- दिलीप सिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापेरेंट्स

शाळेच्या आवारात अनोळखी व्यक्ती आल्यास संबंधित व्यक्तीला थांबवणे, वर्गात जाण्यापासून रोखणे ही शाळेतील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये चर्चा करून अधिक जनजागृती करू.

- महेंद्र गणपुले,प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

प्रत्येक शाळेमध्ये बाल संरक्षक समिती असावी आणि त्या माध्यमातून जाणीव जागृतीचे कार्यक्रम व्हावेत, अशा शासनाच्या सूचना आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत विशेष न्यायालयात महिला मॅजिस्ट्रेटसमोर इन कॅमेरा पीडितेचा जबाब नोंदवून घेतला जातो. अशा घटनांमध्ये आरोपीला स्वत:ची बाजू सिद्ध करावी लागते. यामध्ये वकिलांनी पीडितेची उलटतपासणी घेऊ नये, याबाबत जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.

- नंदिता अंबिके, मुस्कान संस्था

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगMaharashtraमहाराष्ट्र