शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अजब कारभार..! धायरीत रूंदीकरण केलेल्या रस्त्यांवर महापालिकेतर्फे वृक्षारोपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:22 IST

राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे.

ठळक मुद्देसर्व क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचे आदेशत्यासंबधी स्थानिक नागरिकांनी विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे

पुणे: अतिक्रमणांनी अरूंद झालेल्या रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या धायरीकरांना ही अतिक्रमणे निघाल्यामुळे थोडातरी दिलासा मिळाला. मात्र, त्यावर प्रशासनाने लगेचच पाणी टाकले आहे. रस्ता रूंद करून तिथे डांबरीकरण केलेल्या जागेवर वृक्षारोपणासाठी खड्डे खणण्यात आले आहेत.राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. ती पूर्ण करण्यासाठी सध्या सगळी क्षेत्रीय कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय, क्षेत्रनिहाय वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू असून त्यात अगदी आवर्जून किती वृक्ष लावले त्याची संख्या देण्यात येत आहे. १०० पेक्षा कमी वृक्ष लावण्यास कुणी देखील तयार नाही. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे.धायरीकडे जाणारा धायरी फाट्यापासूनचा रस्ता तब्बल ८० फुटांचा आहे. मात्र, सध्या तो ४० फुटांपेक्षाही कमी आणि काही ठिकाणी तर अगदी ३० फूट इतकाच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांच्या पुढे अतिक्रमण केले आहे. काहींनी शेड टाकून ते पक्के केले आहे तर काहींनी तात्पुरते वापरण्यास सुरूवात केली आहे. जिथे दुकानदाराचे अतिक्रमण नसेल तिथे पथारीवाले आपला माल घेऊन दिवसभर व संध्याकाळीही बसतात. त्यामुळे रोजच सकाळी व सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेला या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होत असते. ही बाब लक्षात घेऊनच काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. त्यात काही ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. ती पुन्हा होऊ नये यासाठी त्या जागेवर लगेचच डांबरीकरणही करण्यात आले. आता याच जागेवर खड्डे खोदून वृक्षांची रोपे लावली जात आहेत. ती वाढलीच तर रस्ता पुन्हा अरूंद होणार आहे हे लक्षात न आल्यासारखेच हे काम सुरू आहे. डांबर ओतून हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासंबधी स्थानिक नागरिकांनी विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सरकारने दिलेले ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी मुख्य कार्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना व त्यांनी त्यांच्या कक्षेतील प्रभाग अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभागस्तरावर या एकमेव कार्यक्रमाची लगबग सध्या सुरू आहे. ............रूंदीकरण झालेल्या रस्त्यावर डांबर टाकलेला भाग खोदून तिथे वृक्षांची रोपे लावण्याचा प्रकार महापालिकेतच होऊ शकतो. याबाबत दोन वेळा तक्रार केली, तर कर्मचाऱ्यांनी साहेबांनीच सांगितले आहे असे खास उत्तर दिले. साहेबांशी म्हणजे प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्कच झाला नाही. खड्डे पुन्हा बूजवून रस्ता मोकळा करावा व झाडे लावायचीच असतील तर ती रस्त्याच्या मागे दूरवर लावावीत.महेश महाले, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते-----------------रस्ता अरूंद होणार नाही रुंदीकरण झालेल्या जागेवर असे खड्डे खोदले जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांनी चुकीचे ऐकले असावे किंवा चुकीच्या जागेवर खड्डे खोदले असावेत. याची माहिती घेऊन नागरिकांच्या म्हणण्यानुसार ते सांगतील त्या जागेवरच वृक्ष लागवड केली जाईल. रस्ता अरूंद होऊ देणार नाही.अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक 

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीroad transportरस्ते वाहतूकGovernmentसरकार