शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

यवतमाळ संमेलनाकडे रसिकांचे लक्ष : संमेलनाध्यक्षपदाची कसर मुलाखतीतून भरून निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:03 IST

प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत नाव असलेल्या गणोरकर यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याचा बहुमान देत साहित्य महामंडळाच्या पदाधिकाºयांनी सुवर्णमध्यसाधला आहे. प्रभा गणोरकरयांनी एकीकडे महामंडळाच्या निर्णयावर नाराजीचा सूर लावत दुसरीकडे मुलाखतीचे आमंत्रणही स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११ ते १३ जानेवारी दरम्यान यवतमाळला होत आहे. अनेक वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी होत असलेली निवडणूक रद्द करून, सन्मानाने निवडीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. साहित्य महामंडळाच्या बैठकीत घटक संस्थांनी पाठवलेल्या नावांमधून बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून डॉ. अरुणा ढेरे तर विदर्भ साहित्य संघाने प्रभा गणोरकर यांचे नाव सुचवले होते. विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचे हे शेवटचे वर्ष असल्याने विदर्भाकडे संमेलनाध्यक्षपद राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, साहित्य महामंडळाच्या बैठकीत झालेल्या मतदानानंतर अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता संमेलनात प्रभा गणोरकर यांची विशेष मुलाखत आयोजित करून महामंडळाने कसर भरून काढल्याची चर्चा साहित्यक्षेत्रात आहे.यवतमाळ येथील संमेलनात मुलाखत आयोजित केली असल्याच्या वृत्ताला प्रभा गणोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ‘आपल्या हातून एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे, अशा निश्चयातून ही संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.संमेलनाध्यक्षांच्या नावासाठी पुरुष साहित्यिकांचा विचारही झाला होता. मात्र, सन्मानाने निवड आणि महिला संमेलनाध्यक्ष अशी दोन प्रकारची क्रांती आपण करत आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. संबंधितांना कार्यक्रमाबाबत पत्रे पाठवण्यात आली आहेत. अंतिम स्वरूपावर पुढील दोन-तीन दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे, सध्या कार्यक्रम अथवा मुलाखतीबाबत काहीही भाष्य करता येणार नाही.- डॉ. श्रीपाद जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळराजकारण कधीही बंद होत नसते...महामंडळाने मुलाखतीबाबत कळवले आहे. एवढी वर्षे निवडणुकीने अध्यक्ष ठरत होता, तो आता निवडीने ठरणार आहे. त्यामुळे काहीच फरक पडलेला नाही. राजकारण कधीही बंद होत नसते. निवडणूक असो की निवड, राजकारण कायम असते. त्याचा केवळ चेहरा बदलतो, वरवरचे दृश्य बदलते. निवडीची चांगली गोष्ट आपल्याकडून घडावी, याबद्दल महामंडळाच्या मंडळींनी मनाशी आग्रह बाळगलेला दिसतो. आपल्या हातून एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे, अशा निश्चयातून ही संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. संमेलनाध्यक्षांच्या नावासाठी पुरुष साहित्यिकांचा विचारही झाला होता. मात्र, सन्मानाने निवड आणि महिला संमेलनाध्यक्ष अशी दोन प्रकारची क्रांती आपण करत आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले.- डॉ. प्रभा गणोरकर, कवयित्री

टॅग्स :marathiमराठी