शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न, महसूल, पोलीस प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

राजगुरुनगर: खेड तालुक्यात १२ गावांतून जाणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार ...

राजगुरुनगर: खेड तालुक्यात १२ गावांतून जाणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने पहाटे ६ वाजता रिंगरोड व पुणे- नाशिक रेल्वेविरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरुनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. अखेर प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण स्वःता टाकीजवळ येऊन

तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवून न्याय देऊ, असे सांगितल्यानंतरच पाटीलबुवा गवारी टाकीवरून ४ तासाने खाली उतरले.

तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला असून, खेड प्रांत कार्यालयासमोर गेली नऊ दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण" सुरू आहे. मात्र, प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे समितीने आंदोलन तीव्र केले. आज दि. ६ रोजी रिंगरोड व पुणे-नाशिक रेल्वेविरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी प्रांत कार्यालयासमोरील उंच पाण्याच्या टाकीवर चढून या जीवघेण्या आंदोलनाने महसूल विभाग, पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. पोलीस अटकाव करतील म्हणून पाटीलबुवा गवारी हे पहाटे अंधारात येऊन टाकीवर चढून बसले. सकाळ झाल्यावर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी आंदोलनस्थळी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही खाली येण्यासाठी सांगूनही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, संदीप भापकर यांनी पाटीलबुवा गवारी यांना टाकीवरून खाली उतरण्यासाठी विनंती केली. मात्र, त्यांनी ऐकले नाही. जो पर्यंत सरकार यात लक्ष घालत नाही, रिंगरोड रद्द करत नाही. तसे लेखी देत नाहीत तोपर्यंत खाली येणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन, तर त्यांना खाली येण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते खाली न येता प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत होते. अखेर प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, महसूल विभागाचे पदाधिकारी टाकीच्या खाली येऊन पाटीलबुवा गवारी तुम्ही खाली या, तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात वरिष्ठांकडे पोहोचविल्या जातील. असे सांगितल्यावर गवारी टाकीवरून खाली उतरले. आज सकाळपासून पाटीलबुवा गवारी टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे पाण्याच्या टाकीलगत वाडारोड, कोर्टरोड या रोड या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

रिंगरोड व रेल्वेविरोधात पाटीलबुवा गवारी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन केले.