शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

त्या प्रतिकुल परिस्थितीतही अटलजी स्वत: युध्दभूमीवर आले आणि.....  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 17:19 IST

जवानांशी फक्त संवादच साधला नाही तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे त्यांनी अधिका-यांच्या बरोबरीने चौकशीही केले होते.

ठळक मुद्देयुध्दात प्रत्यक्षदर्शी सहभागी जवानांनी जागविल्या अटलजींच्या स्तिमित करणाऱ्या आठवणी 

पुणे :कारगिल युद्ध हे सर्वात अवघड आणि आव्हानात्मक आणि तितकेच थरारक युद्धसुध्दा होते. या युद्धातील प्रतिकुल व खडतर प्रसंगी पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीवर आले होते. खरंतर त्यांचे येणे आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर त्यांनी जवांनांशी संवाद साधला होता. आणि जवानांशी फक्त संवादच साधला नाही तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे  अधिका-यांच्या बरोबरीने इंट्रोगेशनही (चौकशीही) केले होते. या आठवणी याक्षणी सुध्दा अंगावर रोमांच उभे करतात, अशा शब्दांत खडकीच्या अपंग पुर्नवसन केंद्रातील जवानांनी वाजपेयी बद्दलच्या स्मृती जागवल्या.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज (दि. २५ डिसेंबर) जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून शिवाजीनगरचे आमदार विजय काळे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चासकर,ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दुर्योधन भापकर आणि स्थानिक नगरसेविका कविता युद्धभूमीवर लढताना कायमचे जायबंदी झालेल्या जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना फळांची भेटही दिली. यावेळी केंद्राचे वैद्यकिय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी आणि त्यांचे अन्य अधिकारी तसेच भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोणतिही औपचारिकता नसल्याने स्वागतगीत, पाहुण्यांचा सत्कार, प्रास्ताविक, आभार या नेहमीच्या उपचारांना फाटा देण्यात आला होता हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यामुळेच जवानही जरा मनमोकळेपणाने बोलले.कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले सेना मेडल विजेते मिलिटरी इंटेलिजन्सचे नाईक रमेश पुरी यांनी सुरूवात केली. ते म्हणाले, कारगिल सेक्टरमध्ये युद्धाचे ढग जमायला तेव्हा आपण पुण्यात कुटुंबासमावेत होतो. एक दिवस अचानक मला कारगिलला निघण्याचा संदेश आला आणि आपण तातडिने कारगिलकडे गेलो. मला द्रास सेक्टरमध्ये पाठवण्यात आले. हे युद्ध इतकं विचित्र  अन विषम परिस्थितीतलं होतं की भारतीय सैन्य हे जमिनीवर आणि शत्रूचे सैनिक पहाडांवर. तेथून ते आपल्या सैन्याच्या हलचाली सहजपणे बघत होते आणि डावपेच आखत होते. तशातही आम्ही शत्रूच्या बातम्या काढायला सुरूवात केली.युद्ध सुरू असताना एक दिवस अचानक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वत: युद्धभूमीवर येऊन सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या आगमनाने सैनिकांचा उत्साह वाढला. युद्धभूमीवर गोळीबार सुरू असल्याने पंतप्रधान वाजपेयी यांना आलमागेच आमच्या तळावर थांबवण्यात आले होते. तिथे आपल्या सैन्याने पकडलेले काही शत्रूचे सैनिक होते आणि अधिकारी त्यांची चौकशी करत होते. पंतप्रधान वाजपेयीजी तेथे चौकशीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वत: शत्रूच्या सैनिकांची चौकशी केली. त्यांच्याकडून लष्करी अधिका-यांच्या सारखी महिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले. अर्थात युद्धभूमीवर पंतप्रधानांना फार काळ थांबून देणे योग्य नसल्याने त्यांना पुन्हा परत पाठवण्यात आले.  यावेळी काही जवानांनी प्रत्यक्ष युद्धाचाही आँखोदेखा हाल सांगून सर्वांना स्तिमित केले तर काही जवानांनी अणुस्फोटासारखी जगाला हदरवणारी कृती पंतप्रधान वाजपेयी यांनी करून देशाची मान जगात उंचावली आणि सैन्याचे, देशवासीयांचे मनोबल वाढवले असेही मोकळेपणाने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीwarयुद्धIndian Armyभारतीय जवान