शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

त्या प्रतिकुल परिस्थितीतही अटलजी स्वत: युध्दभूमीवर आले आणि.....  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 17:19 IST

जवानांशी फक्त संवादच साधला नाही तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे त्यांनी अधिका-यांच्या बरोबरीने चौकशीही केले होते.

ठळक मुद्देयुध्दात प्रत्यक्षदर्शी सहभागी जवानांनी जागविल्या अटलजींच्या स्तिमित करणाऱ्या आठवणी 

पुणे :कारगिल युद्ध हे सर्वात अवघड आणि आव्हानात्मक आणि तितकेच थरारक युद्धसुध्दा होते. या युद्धातील प्रतिकुल व खडतर प्रसंगी पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीवर आले होते. खरंतर त्यांचे येणे आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर त्यांनी जवांनांशी संवाद साधला होता. आणि जवानांशी फक्त संवादच साधला नाही तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे  अधिका-यांच्या बरोबरीने इंट्रोगेशनही (चौकशीही) केले होते. या आठवणी याक्षणी सुध्दा अंगावर रोमांच उभे करतात, अशा शब्दांत खडकीच्या अपंग पुर्नवसन केंद्रातील जवानांनी वाजपेयी बद्दलच्या स्मृती जागवल्या.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज (दि. २५ डिसेंबर) जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून शिवाजीनगरचे आमदार विजय काळे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चासकर,ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दुर्योधन भापकर आणि स्थानिक नगरसेविका कविता युद्धभूमीवर लढताना कायमचे जायबंदी झालेल्या जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना फळांची भेटही दिली. यावेळी केंद्राचे वैद्यकिय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी आणि त्यांचे अन्य अधिकारी तसेच भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोणतिही औपचारिकता नसल्याने स्वागतगीत, पाहुण्यांचा सत्कार, प्रास्ताविक, आभार या नेहमीच्या उपचारांना फाटा देण्यात आला होता हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यामुळेच जवानही जरा मनमोकळेपणाने बोलले.कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले सेना मेडल विजेते मिलिटरी इंटेलिजन्सचे नाईक रमेश पुरी यांनी सुरूवात केली. ते म्हणाले, कारगिल सेक्टरमध्ये युद्धाचे ढग जमायला तेव्हा आपण पुण्यात कुटुंबासमावेत होतो. एक दिवस अचानक मला कारगिलला निघण्याचा संदेश आला आणि आपण तातडिने कारगिलकडे गेलो. मला द्रास सेक्टरमध्ये पाठवण्यात आले. हे युद्ध इतकं विचित्र  अन विषम परिस्थितीतलं होतं की भारतीय सैन्य हे जमिनीवर आणि शत्रूचे सैनिक पहाडांवर. तेथून ते आपल्या सैन्याच्या हलचाली सहजपणे बघत होते आणि डावपेच आखत होते. तशातही आम्ही शत्रूच्या बातम्या काढायला सुरूवात केली.युद्ध सुरू असताना एक दिवस अचानक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वत: युद्धभूमीवर येऊन सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या आगमनाने सैनिकांचा उत्साह वाढला. युद्धभूमीवर गोळीबार सुरू असल्याने पंतप्रधान वाजपेयी यांना आलमागेच आमच्या तळावर थांबवण्यात आले होते. तिथे आपल्या सैन्याने पकडलेले काही शत्रूचे सैनिक होते आणि अधिकारी त्यांची चौकशी करत होते. पंतप्रधान वाजपेयीजी तेथे चौकशीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वत: शत्रूच्या सैनिकांची चौकशी केली. त्यांच्याकडून लष्करी अधिका-यांच्या सारखी महिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले. अर्थात युद्धभूमीवर पंतप्रधानांना फार काळ थांबून देणे योग्य नसल्याने त्यांना पुन्हा परत पाठवण्यात आले.  यावेळी काही जवानांनी प्रत्यक्ष युद्धाचाही आँखोदेखा हाल सांगून सर्वांना स्तिमित केले तर काही जवानांनी अणुस्फोटासारखी जगाला हदरवणारी कृती पंतप्रधान वाजपेयी यांनी करून देशाची मान जगात उंचावली आणि सैन्याचे, देशवासीयांचे मनोबल वाढवले असेही मोकळेपणाने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीwarयुद्धIndian Armyभारतीय जवान