शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

ऐतिहासिक सिनेमांसाठी किमान अभ्यास तरी करावा- विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 18:11 IST

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिनानिमित्त चर्चासत्र...

पुणे : ‘मी पानिपत कादंबरी लिहायला पाच वर्षे घेतली. मात्र, त्यावरचा सिनेमा अवघ्या ११ महिन्यांत तयार झाला, मग सिनेमा चालणार कसा? बजेट मिळालं की बनवा सिनेमा असं करून चालणार नाही, त्यासाठी किमान वेळ देणे गरजेचे आहे. 'मुघल ए आझम'ची निर्मिती १२ वर्षे चालली होती. आपण ऐतिहासिक सिनेमा करताना किमान दोन-तीन वर्षे तरी अभ्यास करायला हवा’, असे मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवात 'इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये पाटील, ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर, दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे हे सहभागी होते. त्यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

विश्वास पाटील म्हणाले, आज ऐतिहासिक सिनेमाची कोंडी झाली आहे म्हणायला हरकत नाही. महाभारत आणि रामायण मालिका आल्या, त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्यांचे लेखक हे प्रतिभावान होते. यामुळे पडद्यावर आलेले चित्रण लोकांना भावले. आज आपल्याकडे घाईत काम करायची सवय लागली आहे. परिणामी, दोन वर्षांपूर्वी ज्या दिग्दर्शकांचे कौतुक झाले, आज त्याची छी-थू होतेय ती याच कारणांमुळे. शेवटी एवढेच म्हणेन की, पेराल तसे उगवते, हे सत्य नाकारता येणार नाही.

दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे म्हणाले, आजघडीला मोठा सिनेमा बनवणे आणि चालवणे हे मोठे आव्हान आहे. कारण पायरसी रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान निर्मात्यांपुढे आहे. ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर म्हणाले, आज मराठी चित्रपटांचे भवितव्य अवघड दिसतंय. कारण पहिल्या दिवशीही प्रेक्षक येत नाहीत. ऐतिहासिक चित्रपट वाढल्याने मराठी चित्रपटांची संख्यात्मक नाही मात्र दर्जात्मक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Panipat MovieपानिपतVishwash Patilविश्वास पाटील PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर