शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:07 IST

पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

पुणे : डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळावर टिळा, हातामध्ये टाळ आणि मृदंग, मुखामध्ये हरिनामाचा गजर करत शेकडो वर्षांपासून वारी सुरू आहे. आता वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भक्ती आणि भाव तोच आहे; परंतु १९८५ वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टॅक्टर, ट्रक व इतर वाहने दाखल झाले. पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्ती गुणाने संपन्न, समृद्ध आहे. याला इतिहास आणि भूगोल साक्षीदार आहे. याच साक्षीने गेल्या शेकडो वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा देहू, आळंदीवरून पंढरपूरला जातात. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी संख्या १९८० नंतर वाढत गेली आणि आजही ती वाढतच आहे; परंतु पूर्वी वारकऱ्यांना जेवणासाठी लागणाऱ्या धान्य, वस्तू ठेवण्यासाठी बैलगाड्यांचा सर्रास वापर होत होता.

कालांतराने तंत्रज्ञानाच्या युगात विविध वाहने उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे वारीमध्ये टॅक्टर, ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात सामील झाली. वाहने उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी सोय झाली असून, गॅस सिलिंडरपासून चहा पावडरपर्यंत सर्व वस्तू सुरक्षित राहतात; परंतु पूर्वीच्या काळी जोरदार पाऊस आल्यावर बैलगाडीला बांधण्यात आलेल्या राहुट्यांतून पाणी यायचे. त्यामुळे सर्व वस्तू भिजून जायचे. यामुळे वारकऱ्यांचे हाल होत असे; परंतु वाहनांमुळे सोयीचे झाल्याने वारकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. 

रस्त्यावरील पाणी टँकर झाले गायब :वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोयी व्हावी, यासाठी २००५ पर्यंत प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचे टँकर उभे केले जात होते. त्याच ठिकाणी वारकरी अंघोळ करायचे आणि पुढे जायचे. आता प्रत्येक गावात शाळेमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची, जेवणाची सोयी केली जाते. अंघोळीसाठी गरम पाण्यापासून जेवणासाठी सर्व सोय केली जाते. त्यामुळे पाण्याचे टँकर कमी होत गेले. अन् मळकट वारी गायब झाली :

पूर्वी वारीला जाताना वारकरी एकच धोतर आणि सदरा घेऊन जायचे. त्यामुळे दोन-तीन दिवस तोच धोतर आणि सदरा घालायचे; परंतु आता वाहनांमध्ये कपडे ठेवण्याची सोय झाल्याने प्रत्येक वारकरी किमान दहा ते पंधरा जोड धोतर आणि सदरा घेऊन जातात. शिवाय बारामती, इंदापूर आणि माळीनगर या ठिकाणी वारकऱ्यांच्या कपडे धुण्याची सोय स्थानिक नागरिकांकडून केली जाते. परिणामी कितीही पाऊस आला तरी दररोज कपडे बदलल्यामुळे मळकट, कळकट वारकरी दिसायचे बंद झाले.

वारी म्हणजे वारकऱ्यांच्या शिस्तीचा आणि विठ्ठलभक्तीच्या संगम आहे. मी गेल्या ३२ वर्षांपासून वारी करत आहे. पूर्वीच्या काळी वारकऱ्यांना सोयी नव्हत्या. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता प्रत्येक मुक्कामी सोय आहे. शिवाय दिंड्यांमध्ये वाहने आहेत. त्यामुळे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू सुरक्षित राहतात. वारीला लोकांची गर्दी वाढली तरी वारकऱ्यांमध्ये शिस्त, वागणे, बोलणे, मुखात हरिनाम, भाव आणि भक्ती तोच आहे. - सतीश गव्हाणे, वारकरी

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण