शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Ashadhi Wari 2025: माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:16 IST

रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.

-  भानुदास पऱ्हाडआळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने अंकली (ता. चिकोडी) येथून सुमारे ३०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करत माउलींचे मानाचे दोन्ही अश्व आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत दाखल झाल्यानंतर दोन्ही अश्वांचे विधिवत पूजन करण्यात करून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमोर दोन अश्व असतात. हे दोन्ही अश्व अंकली (ता. चिकोडी, कर्नाटक) येथून दरवर्षी येत असतात. यंदा ८ जूनला या दोन्ही अश्वांनी आळंदीकडे पायी प्रस्थान केले होते. सुमारे तीनशे कि.मी.चा पायी प्रवास अश्वांनी पूर्ण केला. माउलीच्या पालखी सोहळ्याचे आज (दि. १९) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हैबतबाबांनी १८३२ साली सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांचे अश्व या सोहळ्यासाठी असतात. रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.

माउलींच्या रिंगण सोहळ्यात हे दोन्ही अश्व वारकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण असते. वारकरी या अश्वांच्या पायांखालील माती आपल्या मस्तकावर लावून स्वतःला धन्य करून घेत असतो. दरम्यान, आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर (पवार) आणि आळंदी देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त कबीरबुवा लोंढे, माउलींचे मानकरी आणि आळंदीकर ग्रामस्थांनी स्वागत केले. तद्नंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही अश्व फूलवाले धर्मशाळा येथे मुक्कामी नेण्यात आले.

१८३२ सालापासून परंपरा कायम

हैबतबाबांनी १८३२ साली माउलींचा सोहळा स्वतंत्रपणे सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माउलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाजआरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे हे रीतिरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता चोपदार अश्वास निमंत्रण देतात. त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माउलींच्या पादुकाजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तेथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतर वेळी कधीही माउलीच्या अश्वावर कोणीही बसत नाही, अशी माहिती श्रीमंत सरदार ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी दिली.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Indian Festivalsभारतीय उत्सव-सण