शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

Ashadhi Wari 2025: माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:16 IST

रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.

-  भानुदास पऱ्हाडआळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने अंकली (ता. चिकोडी) येथून सुमारे ३०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करत माउलींचे मानाचे दोन्ही अश्व आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत दाखल झाल्यानंतर दोन्ही अश्वांचे विधिवत पूजन करण्यात करून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमोर दोन अश्व असतात. हे दोन्ही अश्व अंकली (ता. चिकोडी, कर्नाटक) येथून दरवर्षी येत असतात. यंदा ८ जूनला या दोन्ही अश्वांनी आळंदीकडे पायी प्रस्थान केले होते. सुमारे तीनशे कि.मी.चा पायी प्रवास अश्वांनी पूर्ण केला. माउलीच्या पालखी सोहळ्याचे आज (दि. १९) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हैबतबाबांनी १८३२ साली सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांचे अश्व या सोहळ्यासाठी असतात. रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.

माउलींच्या रिंगण सोहळ्यात हे दोन्ही अश्व वारकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण असते. वारकरी या अश्वांच्या पायांखालील माती आपल्या मस्तकावर लावून स्वतःला धन्य करून घेत असतो. दरम्यान, आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर (पवार) आणि आळंदी देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त कबीरबुवा लोंढे, माउलींचे मानकरी आणि आळंदीकर ग्रामस्थांनी स्वागत केले. तद्नंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही अश्व फूलवाले धर्मशाळा येथे मुक्कामी नेण्यात आले.

१८३२ सालापासून परंपरा कायम

हैबतबाबांनी १८३२ साली माउलींचा सोहळा स्वतंत्रपणे सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माउलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाजआरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे हे रीतिरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता चोपदार अश्वास निमंत्रण देतात. त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माउलींच्या पादुकाजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तेथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतर वेळी कधीही माउलीच्या अश्वावर कोणीही बसत नाही, अशी माहिती श्रीमंत सरदार ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी दिली.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Indian Festivalsभारतीय उत्सव-सण