शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या नाराजीला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. दिग्विजय सिंह गेल्या 27 वर्षांपासून दर आषाढीला पंढरपूरला दर्शनासाठी जातात. यंदाही दर्शन घेऊन त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः ज्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा सामना करत आहेत. या गोष्टीला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्या समाजांची नाराजी साहजिक आहे. अनेक वर्षांची परंपरा होती की मुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेला उपस्थित राहतात. यंदा मात्र भाजपचा कोणीही मंत्री नव्हता. एवढे का घाबरतात ते लोक असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

(Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे)

यावेळी त्यांनी अविश्वास ठरावावरही आपले मत मांडले. या ठरावावर भाषणे सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीवरही त्यांनी भाष्य केले. मिठी मारणे संसदेच्या परंपरेच्या विरोधात नाही.यापूर्वीही लोकप्रतिनिधी एकमेकांना भेटायचे. हातात हात घेत असत असेही त्यांनी सांगितले. लोकांना काही कारण नसताना अफवा पसरवून मारलं जात आहे मात्र लहान लहान मुद्यांवर ट्विट करणारे पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेना कायम त्यांच्यासोबत निवडणूक लढवत आली. मात्र नुकत्याच अविश्वास प्रस्तावात त्यांनी भाजपाला मदत केली नाही.त्यांनीही भाजपावर अविश्वास दाखवला असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांना 125 कोटी भारतीयांचे समर्थन आहे असे नाही. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली. या सरकारने 15 लाख कोटी रुपये खात्यात जमा केले तर नाहीच. काळा पैसा परत आणू असेही सांगितले. पण ते आणणे तर लांबच पण भारतीयांचा आहे तो पैसा ही बाहेर गेला. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल असा सरकारचा दावा होता. मात्र त्यालाही यश आले नाही. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्या त्यांचा पंतप्रधान झाल्यावर पूर्ण स्वीकार केला. भाजपा हिंदूंमध्ये धर्मांधता पसरवत आहे तर ओवैसी मुस्लिम समाजात धर्मांधता पसरवत आहेत असेही भाष्य त्यांनी केले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीDigvijaya Singhदिग्विजय सिंहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेस