शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या नाराजीला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. दिग्विजय सिंह गेल्या 27 वर्षांपासून दर आषाढीला पंढरपूरला दर्शनासाठी जातात. यंदाही दर्शन घेऊन त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी बातचीत केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः ज्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा सामना करत आहेत. या गोष्टीला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे सांगितले होते. त्यामुळे त्या समाजांची नाराजी साहजिक आहे. अनेक वर्षांची परंपरा होती की मुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेला उपस्थित राहतात. यंदा मात्र भाजपचा कोणीही मंत्री नव्हता. एवढे का घाबरतात ते लोक असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

(Ashadhi Ekadashi : 'बा विठ्ठला' बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे वर्षावरुनच साकडे)

यावेळी त्यांनी अविश्वास ठरावावरही आपले मत मांडले. या ठरावावर भाषणे सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीवरही त्यांनी भाष्य केले. मिठी मारणे संसदेच्या परंपरेच्या विरोधात नाही.यापूर्वीही लोकप्रतिनिधी एकमेकांना भेटायचे. हातात हात घेत असत असेही त्यांनी सांगितले. लोकांना काही कारण नसताना अफवा पसरवून मारलं जात आहे मात्र लहान लहान मुद्यांवर ट्विट करणारे पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेना कायम त्यांच्यासोबत निवडणूक लढवत आली. मात्र नुकत्याच अविश्वास प्रस्तावात त्यांनी भाजपाला मदत केली नाही.त्यांनीही भाजपावर अविश्वास दाखवला असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांना 125 कोटी भारतीयांचे समर्थन आहे असे नाही. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका केली. या सरकारने 15 लाख कोटी रुपये खात्यात जमा केले तर नाहीच. काळा पैसा परत आणू असेही सांगितले. पण ते आणणे तर लांबच पण भारतीयांचा आहे तो पैसा ही बाहेर गेला. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल असा सरकारचा दावा होता. मात्र त्यालाही यश आले नाही. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्या त्यांचा पंतप्रधान झाल्यावर पूर्ण स्वीकार केला. भाजपा हिंदूंमध्ये धर्मांधता पसरवत आहे तर ओवैसी मुस्लिम समाजात धर्मांधता पसरवत आहेत असेही भाष्य त्यांनी केले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीDigvijaya Singhदिग्विजय सिंहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेस