शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:39 IST

आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे

पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्रातील या सहा कुटुंबाना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आसावरी जगदाळे आणि त्यांच्या आई प्रगती यांच्याशी संवाद साधला. पहलगाम घटनेबाबत राजकारण करून आमच्या भावनांशी खेळू नका. अशी विनंती असावरी जगदाळेच्या आईने केली आहे.  

त्या म्हणाल्या, अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत, मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही. लोक अजून आम्हाला भेटायला येत आहेत. आम्ही अजूनही त्या फायरींगच्या घटनेतच आहोत. असावरीला सरकारकडून आश्वासन मिळाली आहेत. म्हणून मी आनंदी आहे. पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आमची सगळ्या राजकीय लोकांना एक विनंती आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी बोलून आम्हाला मारलंय, आम्ही सगळं खर सांगितलं आहे. आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. त्याच राजकारण करू नका. त्यांनी गोळ्या झाडल्यावर मेंदू कसा बाहेर आला हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी माणुसकी म्हणून सर्वानी विचार केला पाहिजे. वक्तव्य करणं, बोलणं सोपं आहे. त्या घटनेत लहान मुलांनी जे सांगितलंय तेही खरं आहे. तुम्ही आमच्याशी वागू नका नका. आम्ही कुणीही काही खोटं बोलत नाही. तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नाही, हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.

आम्हाला सेक्युरिटी द्या - असावरी जगदाळे 

आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.  मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सेक्युरिटी मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशा ठिकाणी मला जॉबमध्ये जागा मिळायला हवी. पुणे सोडून कुठेही जाता येणार नाही. पुण्यात जॉब असावा. राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालय ते काही बदलणार नाही. किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत. आमचं भविष्य अंधारमय झालय. पैशांनी गोष्टी मिळतात. पण माणूस म्हणून आधार मिळत नाही. त्यांनी मानसिक आधार दिला आहे. मी सरकारचे खूप आभार मानते. 

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षणPoliticsराजकारण