शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक; हा तर सत्तेचा गैरवापर - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 10:13 IST

अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात मोठे विधान केले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात घातल्यानंतर बुधवारी (दि. २८) बाहेर आले. त्यांच्या या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात मोठे विधान केले. ‘सत्तेचा गैरवापर करून त्यांना आत टाकले होते. सत्तेचा चुकीच्या पद्धतीने असा वापर करणे योग्य नाही’, असे पवार म्हणाले.

पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अधिवेशनात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक आहे. कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे की, ज्या व्यक्तीवरचा पहिला आरोप शंभर कोटींचा अपहार केला, असा हाेता. तो नंतर चार्जशीटवर शंभर हा आकडा नव्हे तर साडेचार कोटी म्हणून खाली आला. फायनल चार्जशीट दिले, त्यात एक कोटीचा अपहार झाल्याचे दिसत आहे. यात काहीही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ज्या यंत्रणेने हे निर्णय घेतले, त्या यंत्रणेसंबंधी अधिक माहिती एकत्रित करून संसदेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. आमच्या सहकाऱ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, इतरांवर ती स्थिती येऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.

...त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करायला हवा

 सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला कारण नसताना जवळपास १३ महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. आज समाधानाची गोष्ट ही आहे की, शेवटी न्यायपालिकेने न्याय दिला आणि ते बाहेर आले. पण, ही स्थिती ज्यांनी निर्माण केली, त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करायला हवा. - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocialसामाजिक