शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान

By नितीश गोवंडे | Updated: May 30, 2023 16:54 IST

शेजारील राष्ट्रांची भारताशेजारील बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज

पुणे : जागतिक परिस्थिती सध्या बदलत आहे. देशाच्या उत्तर सीमेवर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच हिंद महासागरात त्यांचा वावर वाढलेला आहे. यासोबतच शेजारील राष्ट्रांची भारताशेजारील बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज आहे. चीनशी संघर्ष नको असला तरी देशाच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज आहे, असा विश्वास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केला. मंगळवारी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४ व्या तुकडीचे दीक्षांत संचालन मंगळवारी खेत्रपाल मैदानावर उत्साहात पार पडले. यावेळी या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सीडीएस अनिल चव्हाण बोलत होते.

या दीक्षांत सोहळ्यावेळी लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्ट. जन. अजयकुमार सिंग, एनडीए कमांडंट अजय कोचर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल संजीव डोगरा यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रपती सुवर्णपदक अफरीदी अफरोज, रौप्य पदक अंशु कुमार आणि ब्राँझ पदक प्रवीण सिंग यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

चौहान म्हणाले, देशाच्या उत्तर सीमेवर चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या आहेत. १९६२ पासून ते मागे गेलेले नाहीत. भारतीय सीमेवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये अशी आशा आहे. उत्तर सीमेवर चीन सोबत संघर्ष करण्याची मनीषा नाही. मात्र, असे असताना भारतीय भूभागाचे रक्षण ही आमची जबाबदारी असून ही जबाबदारी आम्ही चोख पणे पार पाडू. मंगळवारी एनडीए येथे पार पडलेल्या संचलन सोहळ्यात मी काही मुली पाहिल्या. त्यांना पाहून मनापासून आनंद झाला. मी या मुलींचे मनापासून अभिनंदन करतो की, आज त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्या उभ्या आहेत. इतिहासात झाशीच्या राणीने ब्रिटिशांशी लढा दिला. त्याच प्रमाणे तुम्ही सुद्धा प्रेरणा घेऊन देशासमोरील आव्हानांना तोंड देत देशाचे रक्षण कराल. जेव्हा स्वतःला विसरून तुम्ही देशाची सुरक्षा कराल तेव्हा तुम्ही खरे सैनिक म्हणून ओळखले जाल, असेही चौहान म्हणाले. भारतीय लष्कर नव्या तंत्रज्ञाचा स्वीकार करत आहे. नव्या तंत्रज्ञानाची उत्क्रांती लष्करात होत आहे. अशा परिस्थितीत मला विश्वास आहे की आगामी काळात तुम्ही एकत्र येऊन काम कराल, असे म्हणत चौहान यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मणिपूरमधील आव्हाने संपलेली नाहीत, थोडा वेळ लागेल 

मणिपूर येथे सध्या जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. मणीपुर येथे २०२० मध्ये लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात होते. त्यावेळी तेथील परिस्थिती नियंत्रणात होती. यामुळे कालांतराने येथील लष्कर कमी करण्यात आले. तेथील बंडखोरी नियंत्रणात आली आहे. दरम्यान, जे सध्या मणिपूर येथे सुरू आहे, त्याचा बंडखोरीशी काही संबंध नाही. मणिपूर येथे असलेल्या दोन जातीमधील हा संघर्ष आहे. यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराने त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आहे. अद्याप मणिपूर मधील आव्हाने संपलेली नाहीत. पण, येत्या काळात परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्या ठिकाणी सुरू असलेली परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकार योग्य पद्धतीने हाताळेल, अशा विश्वास देखील सीडीएस चौहान यांनी व्यक्त केला.

तिन्ही दलांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला वेग..

भारतीय लष्कर वेगाने बदल करत आहे. यातील महत्वाचा बदल म्हणजे तिन्ही दलांचे एकत्रीकरण करणे आहे. लष्कराच्या ‘थेटरायझेशन’ची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या अंतर्गत संयुक्तता आणि एकत्रीकरण हे दोन भाग असून या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात आमचं त्या दिशेने काम सुरू असल्याचे चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDefenceसंरक्षण विभागForceफोर्सSocialसामाजिकIndiaभारतchinaचीन