शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार सुरक्षित आहेत का? फायर ऑडिट होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST

चाकण : ‘ऑटोमोबाइल हब’ म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये हजारोंच्या संख्येने लहान-मोठे कारखाने अहोरात्र कार्यरत आहेत. या कारखान्यांत ...

चाकण : ‘ऑटोमोबाइल हब’ म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये हजारोंच्या संख्येने लहान-मोठे कारखाने अहोरात्र कार्यरत आहेत. या कारखान्यांत काम करणारे कामगार नक्की सुरक्षित आहेत का, हा प्रश्न नुकत्याच पिरंगुट येथे घडलेल्या आगीच्या घटनेवरून समोर आला आहे. कारण चाकण औद्योगिक वसाहतीमध्येही अनेकदा आगीच्या जीवघेण्या घटना घडल्या आहेत.

वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चाकण एमआयडीसीने जगात नावलौकिक मिळविला आहे. परंतु विकास करताना नागरिकांच्या मूलभूत गरजा व सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी अनेक खासगी गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिसून येत नाही. अशी अनेक गोदामे निवासी भागांमध्ये उभी करून या गोदामातून असंख्य छोटे-मोठे उद्योगधंदे केले जात आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता काम करून घेतले जात असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.

चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यात व गोदामात तसेच मोठ्या सोसायट्यांच्या इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आल्याच नाहीत. आग लागल्यावर लोकांना त्वरित बाहेर पडता येत नाही. यासाठी औद्योगिक वसाहतीतील कारखाने व गोदामांचे फायर ऑडिट करणे, प्रत्येक इमारतींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना सक्तीचे करणे गरजेचे आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर गोदामातून किंवा इमारतीतून लोकांना त्वरित बाहेर पडण्यासाठी पुरेशी आपत्कालीन मार्गाची व्यवस्था नाही. यासाठी संबंधित विभागाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला हवे. गोदामात किंवा कारखान्यात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांसंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांनी अशा घटनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

* चाकण परिसरातील अनेक गोदामे रहिवासी भागात असल्याने आग लागल्यावर अग्निशामक दलाच्या गाड्या जाणे ही अडचणीचे होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही जीवित व वित्तहानी टाळणे अवघड होऊन बसते. याकरिता गोदाम भाड्याने घेताना ते कोणत्या झोनमध्ये आहे. कायदेशीर परवानगी घेवून बांधकाम केले आहे का, या गोदामात कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, याची काळजी घेऊनच उद्योजकांनी गोदामे भाडेतत्त्वावर घेणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षांमध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान-मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये खराबवाडी येथील बेकायदेशीर गोदामाला भीषण आग लागून पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर भांबोली येथील एका कंपनीच्या कंपाऊंड बांधकाम कोसळून त्यात कामगारांचा मृत्यू झाला होता. या ठळक जीवघेण्या घटनांसह आर्थिक नुकसानीच्या आगीच्या घटना नेहमीच घडतात.