शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भारतीय संस्कृतीत जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर; डॉ. मोहन भागवत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:06 IST

सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असून ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतो

पुणे: समाज आणि मनुष्य केंद्रस्थानी ठेवून जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी प्रयत्न झाले, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून प्रयोग केले गेले तरीही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे अमृत निघाले त्याचा लाभ घेणाऱ्यांनी घेतला. पण जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही. ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीत आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

'प्रसाद प्रकाशना'च्या अमृतमहोत्सवाचा सांगता समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनप्रसंगी ते बाेलत होत. यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. उमा बोडस आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की, सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत असतो. परंतु या धावपळीत ज्या शाश्वत सुखाचा तो पाठलाग करीत असतो, ते सुख निसटते. ज्ञान, सुख आणि समृद्धी वाढली तरी अपूर्णतेची एक जाणीव आणि बोच सदैव जाणवत राहिली.

मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी नसून उत्तरे शोधणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतु आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर ऊहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल ॲनिमलपासून सेल्फीश ॲनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतcultureसांस्कृतिकSocialसामाजिक