शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृतीत जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर; डॉ. मोहन भागवत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:06 IST

सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असून ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतो

पुणे: समाज आणि मनुष्य केंद्रस्थानी ठेवून जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी प्रयत्न झाले, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून प्रयोग केले गेले तरीही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे अमृत निघाले त्याचा लाभ घेणाऱ्यांनी घेतला. पण जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही. ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीत आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

'प्रसाद प्रकाशना'च्या अमृतमहोत्सवाचा सांगता समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनप्रसंगी ते बाेलत होत. यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. उमा बोडस आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की, सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत असतो. परंतु या धावपळीत ज्या शाश्वत सुखाचा तो पाठलाग करीत असतो, ते सुख निसटते. ज्ञान, सुख आणि समृद्धी वाढली तरी अपूर्णतेची एक जाणीव आणि बोच सदैव जाणवत राहिली.

मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी नसून उत्तरे शोधणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतु आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर ऊहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल ॲनिमलपासून सेल्फीश ॲनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतcultureसांस्कृतिकSocialसामाजिक