शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भारतीय संस्कृतीत जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर; डॉ. मोहन भागवत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:06 IST

सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असून ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतो

पुणे: समाज आणि मनुष्य केंद्रस्थानी ठेवून जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी प्रयत्न झाले, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून प्रयोग केले गेले तरीही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे अमृत निघाले त्याचा लाभ घेणाऱ्यांनी घेतला. पण जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही. ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीत आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

'प्रसाद प्रकाशना'च्या अमृतमहोत्सवाचा सांगता समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनप्रसंगी ते बाेलत होत. यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. उमा बोडस आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की, सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत असतो. परंतु या धावपळीत ज्या शाश्वत सुखाचा तो पाठलाग करीत असतो, ते सुख निसटते. ज्ञान, सुख आणि समृद्धी वाढली तरी अपूर्णतेची एक जाणीव आणि बोच सदैव जाणवत राहिली.

मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी नसून उत्तरे शोधणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतु आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर ऊहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल ॲनिमलपासून सेल्फीश ॲनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतcultureसांस्कृतिकSocialसामाजिक