शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

अंदमान, निकोबार बेटाला शहीद आणि स्वराज्य नाव द्यावे : मधुकर आडेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:09 PM

शासनाने अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी केली.

ठळक मुद्देनेताजींची ही इच्छा आतापर्यंत राज्यकर्ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत : आडेलकर 'प्रसिद्ध माध्यमांनीही पुढाकार घ्यावा आणि शासनदरबारी हा विषय लावून धरावा'

पुणे : स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी दिलेल्या अनेक स्थळांच्या नावात बदल करण्यात आला. आजही देशात अशा अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी दिलेल्या नावानेच अद्यापही ओळखले जाते. त्यापैकी एक म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटे. या बेटांना शहीद आणि स्वराज्य या नावाने ओळखले जावे, अशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी व्यक्त केली होती. शासनाने त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अर्चना देसाई, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. भाई वैद्य, भाविका काळे आदी उपस्थित होते.आडेलकर म्हणाले, नेताजींची ही इच्छा आतापर्यंत राज्यकर्ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत. शिवाय सामान्य जनतेलाही आता हळूहळू नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विस्मरण होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या बेटांचे नेताजींच्या इच्छेप्रमाणे नामकरण केले, तर नेताजींच्या स्मृतींचा तो योग्य सन्मान ठरेल. आणि भारतीयांच्या मनात आपल्याच देशाच्या दूरवर असलेल्या भागांबद्दल तेथील समस्यांच्या जागरूकता निर्माण होईल. यासाठी प्रसिद्ध माध्यमांनीही पुढाकार घ्यावा आणि शासनदरबारी हा विषय लावून धरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसPuneपुणेBhai Vaidyaभाई वैद्य