शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

... अन् ‘डेक्कन क्वीन’ प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 16:23 IST

दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याचा समज होऊन एकच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देऑटोमॅटिक सिग्नलने वाढली रेल्वेची धाव

पुणे : सकाळी ८ ची वेळ... मुंबईच्या दिशेने डेक्कन क्वीन झेपावत होती... मळवली ते लोणावळादरम्यान याच मार्गावर काही अंतरावर एक लोकल असल्याचे दिसते... ही लोकल पुण्याकडे येत असल्याने आता दोन्ही गाड्या समोरासमोर येणार या भीतीने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकतो... पण प्रत्यक्षात लोकल लोणावळ्याकडे जाणारीच होती. पुढे काही तांत्रिक कारणांमुळे थांबली असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येते. ही कमाल आहे, ऑटोमॅटिक ब्लॉग सिग्नलिंग यंत्रणेची.दररोज सकाळी ७.२० वाजता पुणे स्टेशन येथून डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना होते. त्याआधी अर्धा तासापुर्वी लोणावळा लोकल निघाली होती. मळवली व लोणावळादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ही गाडी मळवली स्थानकाजवळ थांबते. या गाडीच्या मागेच डेक्कन क्वीन धावत असल्याने काही वेळात या लोकलपासून १०० ते १५० मीटर अंतरावर थांबते. लोकलला दोन्ही बाजुला इंजिन असल्याने डेक्कन क्वीनमधील प्रवाशांना ही गाडी आपल्याच दिशेने येत असल्याचा समज झाला. दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याचा समज होऊन एकच गोंधळ उडाला. पण प्रत्यक्ष स्थिती लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, रेल्वेमार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी एकामागोमाग एक दोन-तीन गाड्या असु शकतात. लोकलला दोन्ही बाजूने इंजिन असल्याने प्रवाशांचा गैरसमज झाला. पण काळजी करण्यासारखे काही नसल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले.-------------------------------* ऑटोमॅटिक सिग्नलने वाढली रेल्वेची धावदेशभरातील अनेक मार्गांवर टोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. मुंबईतील लोकल गाड्या या यंत्रणेद्वारेच धावतात. मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये लोणावळा ते चिंचवड दरम्यान प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर असे सिग्नल उभारण्यात आले आहे. तर चिंचवड ते शिवाजीनगर दरम्यानही सिग्नल उभारण्याचे काम सुरू आहे. या यंत्रणेमुळे एकाच मार्गावर एकामागोमाग एक गाड्या धावु शकतात. पुणे रेल्वे स्थानकातून लोकलसह मुंबईच्या दिशेने पुर्वी दिवसभरात १०० गाड्या धावत होत्या. या यंत्रणेमुळे ही क्षमता १४० पर्यंत पोहचली आहे.     सिग्नल यंत्रणेमुळे एखादी गाडी पुढे धावत असल्यास पाठीमागून येणाºया गाडीला प्रत्येक किलोमीटर अंतरावर रेड किंवा ग्रीन सिग्नल दिला जातो. पुढील गाडी थांबलेली असल्यास, वेग कमी झाला असल्यास मागील गाडीला एक किलोमीटरवरच रेड सिग्नल मिळतो. त्यामुळे ही गाडी किमान एक मिनीटापर्यंत थांबते. त्यानंतर दिवसा ताशी १५ किलोमीटर वेगाने या गाडीला पुढे जाण्याची परवानगी असते. पुढील गाडी दिसल्यानंतर किमान १५० मीटर अंतरावर थांबणे आवश्यक आहे. रेल्वेगाडीचे अंतर सुमारे ७०० मीटरपर्यंत असते. त्यामुळे पुढील सिग्नलला एखादी गाडी उभी असल्यास मागील गाडी त्याआधीच्या सिग्लनलाच थांबते. या यंत्रणेमुळे एकाच दिशने जाणाºया गाड्या एकमेकांना धडकु शकत नाहीत. प्रत्येक एक किलोमीटरला सिग्नलद्वारे ‘ब्लॉक’ करण्यात आल्याने त्यामधील गाडी ‘ट्रॅक’ होते. त्यानुसार इतर सिग्नलला आपोआप सुचना पाठविल्या जातात.     यंत्रणेमुळे रेल्वेमार्गाची क्षमता वाढल्याने गाड्यांची संख्याही वाढली आहे. याचा फायदा प्रवाशांनाही होत आहे. पुर्वी ही यंत्रणा नसल्याने गाड्यांना एखाद्या स्थानकावरच थांबावे लागत होते. पुढील गाडी स्थानक सोडून गेल्यानंतर मागची गाडी रवाना होत होती. आता सिग्नल यंत्रणेमुळे चिंचवड ते लोणावळादरम्यान कोणत्याही स्थानकावर थांबावे लागत नाही. एकामागोमाग एक गाड्या धावत असतात. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच अधिक गाड्या मार्गावरून धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. -----------

टॅग्स :Puneपुणेlonavalaलोणावळाlocalलोकलrailwayरेल्वे