शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

मावळची ओळख असलेला आंबेमोहोर तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 11:27 IST

आंबेमोहोर तांदूळ मावळ तालुक्यातून हद्दपार होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर...

- योगेश घोडके

शिवणे मावळ :मावळ तालुका हे पावसाचे माहेर घर मानले जाते. तालुक्यामध्ये पावसाळ्यात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे भाताचे पीक तालुक्यामध्ये अनेक प्रकारची भाताची पिके घेतली जातात. परंतु, गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी आंबेमोहोर तांदूळ खूप प्रसिद्ध होता. आंबेमोहोर हा तांदूळ चवदार व सुवासिक असल्यामुळे या तांदळाचे मावळात मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आंबेमोहोर तांदूळ मावळ तालुक्यातून हद्दपार होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

आंबेमोहोर तांदूळ मावळातच नव्हे तर पुणेपुणे जिल्ह्याबाहेरच्या बाजारपेठेत ही चवीसाठी प्रसिद्ध असलेला सुवासिक तांदूळ आता पूर्णपणे हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. नगण्य क्षेत्रामध्ये काही शेतकरी त्याचे पीक घेत आहेत. शेतात पीक उभे असताना वाऱ्याची झुळक आली तरी आसपासच्या परिसरात आंबेमोहोरचा वास दरवळत असे मात्र या प्रकारचा सुवासिक तांदूळ सध्या कमी प्रमाणात आढळत आहे. सध्या काही भागात आंबेमोहोर तांदूळ मिळतो. त्याला रासायनिक खताच्या वापरामुळे पूर्वीसारखा वास व चव राहिलेली नाही.

पंचवीस वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये इंद्रायणी जातीचे भाताचे बियाणे विकसित करण्यात आले. इंद्रायणीची उत्पादकता इतर जातीच्या भातापेक्षा अधिक असल्यामुळे आणि त्याची चव व वास चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताला प्राधान्य दिले. साहजिकच त्याचा प्रसार पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या इतर भागात झपाट्याने झाला.

इंद्रायणीच्या आगमनामुळे आंबेमोहोरसह रत्नागिरी २४, रत्ना, कोळंबा, कर्जत १८४, काळी कुसळ, वरंगळ, जिरायत, पार्वती व स्थानिक जातींचे उत्पादन मागे पडले आहे. चव आणि वास याबाबत इतर तांदळांपेक्षा इंद्रायणी सरस असला तरीही आंबेमोहोरची जागा इंद्रायणीला घेता आलेली आहे, असे ज्येष्ठ शेतकरी सांगतात.

आंबेमोहोर भाताचे पिक पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मावळ तालुक्यामध्ये ९० टक्के होते. इतर भाताची पिके १० टक्के होती. गेल्या वर्षी इंद्रायणी भात ९० टक्के, आंबेमोहोर ३ टक्के व इतर भात पिके ७ टक्के घेतली गेली.

आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनाचा खर्च अधिक व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली. आंबेमोहोर भात उत्पादनाचा खर्च व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे व वादळी पावसामध्ये आंबेमोहोर शेतामध्ये आडवा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकेकाळी आंबेमोहोर तांदळाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यातच त्याचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. चवीसाठी प्रसिद्ध असलेला हा सुवासिक तांदूळ आता मावळातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

आंबेमोहोर भाताचे बियाणे मिळत नाही तसेच भात अधिक उंच होत असल्यामुळे ते शेतीमध्ये आडवे पडते. आंबेमोहोर पिकाला संपूर्णपणे तयार होण्यासाठी इतर भातापेक्षा अधिक कालावधी लागतो. आंबेमोहोर भात पीक घेण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागते. आंबेमोहोर हा मार्केटमध्ये जास्त किमतीमध्ये विकला जाणारा तांदूळ आहे. त्यासोबतच मार्केटमध्ये चांगली मागणी देखील आहे. आंबेमोहोर हे स्थानिक वाण आहे. त्याचे सर्वांनी जतन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी स्थानिक वाण टिकवण्यासाठी आंबेमोहोर तांदळाचे पीक घेणे आवश्यक आहे.

- दत्तात्रय पडवळ, कृषी अधिकारी, मावळ.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळMaharashtraमहाराष्ट्र