शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मावळची ओळख असलेला आंबेमोहोर तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 11:27 IST

आंबेमोहोर तांदूळ मावळ तालुक्यातून हद्दपार होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर...

- योगेश घोडके

शिवणे मावळ :मावळ तालुका हे पावसाचे माहेर घर मानले जाते. तालुक्यामध्ये पावसाळ्यात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे भाताचे पीक तालुक्यामध्ये अनेक प्रकारची भाताची पिके घेतली जातात. परंतु, गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी आंबेमोहोर तांदूळ खूप प्रसिद्ध होता. आंबेमोहोर हा तांदूळ चवदार व सुवासिक असल्यामुळे या तांदळाचे मावळात मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आंबेमोहोर तांदूळ मावळ तालुक्यातून हद्दपार होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

आंबेमोहोर तांदूळ मावळातच नव्हे तर पुणेपुणे जिल्ह्याबाहेरच्या बाजारपेठेत ही चवीसाठी प्रसिद्ध असलेला सुवासिक तांदूळ आता पूर्णपणे हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. नगण्य क्षेत्रामध्ये काही शेतकरी त्याचे पीक घेत आहेत. शेतात पीक उभे असताना वाऱ्याची झुळक आली तरी आसपासच्या परिसरात आंबेमोहोरचा वास दरवळत असे मात्र या प्रकारचा सुवासिक तांदूळ सध्या कमी प्रमाणात आढळत आहे. सध्या काही भागात आंबेमोहोर तांदूळ मिळतो. त्याला रासायनिक खताच्या वापरामुळे पूर्वीसारखा वास व चव राहिलेली नाही.

पंचवीस वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये इंद्रायणी जातीचे भाताचे बियाणे विकसित करण्यात आले. इंद्रायणीची उत्पादकता इतर जातीच्या भातापेक्षा अधिक असल्यामुळे आणि त्याची चव व वास चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताला प्राधान्य दिले. साहजिकच त्याचा प्रसार पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या इतर भागात झपाट्याने झाला.

इंद्रायणीच्या आगमनामुळे आंबेमोहोरसह रत्नागिरी २४, रत्ना, कोळंबा, कर्जत १८४, काळी कुसळ, वरंगळ, जिरायत, पार्वती व स्थानिक जातींचे उत्पादन मागे पडले आहे. चव आणि वास याबाबत इतर तांदळांपेक्षा इंद्रायणी सरस असला तरीही आंबेमोहोरची जागा इंद्रायणीला घेता आलेली आहे, असे ज्येष्ठ शेतकरी सांगतात.

आंबेमोहोर भाताचे पिक पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मावळ तालुक्यामध्ये ९० टक्के होते. इतर भाताची पिके १० टक्के होती. गेल्या वर्षी इंद्रायणी भात ९० टक्के, आंबेमोहोर ३ टक्के व इतर भात पिके ७ टक्के घेतली गेली.

आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनाचा खर्च अधिक व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली. आंबेमोहोर भात उत्पादनाचा खर्च व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे व वादळी पावसामध्ये आंबेमोहोर शेतामध्ये आडवा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकेकाळी आंबेमोहोर तांदळाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यातच त्याचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. चवीसाठी प्रसिद्ध असलेला हा सुवासिक तांदूळ आता मावळातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

आंबेमोहोर भाताचे बियाणे मिळत नाही तसेच भात अधिक उंच होत असल्यामुळे ते शेतीमध्ये आडवे पडते. आंबेमोहोर पिकाला संपूर्णपणे तयार होण्यासाठी इतर भातापेक्षा अधिक कालावधी लागतो. आंबेमोहोर भात पीक घेण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागते. आंबेमोहोर हा मार्केटमध्ये जास्त किमतीमध्ये विकला जाणारा तांदूळ आहे. त्यासोबतच मार्केटमध्ये चांगली मागणी देखील आहे. आंबेमोहोर हे स्थानिक वाण आहे. त्याचे सर्वांनी जतन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी स्थानिक वाण टिकवण्यासाठी आंबेमोहोर तांदळाचे पीक घेणे आवश्यक आहे.

- दत्तात्रय पडवळ, कृषी अधिकारी, मावळ.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळMaharashtraमहाराष्ट्र