शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच मेट्रोही लवकरच सुरु करणार; अजित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:38 IST

पुण्यातील मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांच्या सदा आनंदनगर प्रकल्पाअंतर्गत १३० घरांचे चावी वाटपाच्या लोकार्पण सोहळा

ठळक मुद्देलोकांना मूलभूत गरजा मिळणं जास्त गरजेचं

पुणे : पुण्याचा विस्तार झाल्यापासून प्रशासन विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलू लागले आहे. शहर आणि ग्रामीण भागात नवीन इमारतींची उभारणी केली जात आहे. रस्ते, वाहतुकीबाबतही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात प्रशासन काम करत आहे. त्या सर्व अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

पवार म्हणाले,  पुणेकरांना आता व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे. मेट्रोचा प्रश्न लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच विकासकामं व्यवस्थित व्हावीत याच्याशी माझाही प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांच्या सदा आनंदनगर प्रकल्पाअंतर्गत १३० घरांचे चावी वाटपाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.   

''रिंगरोडच्या प्रश्नांबाबत शेतकऱ्यांचा विरोध दिसून येत आहे. गावागावात अन्नदात्याकडून आंदोलने केली जातं आहेत. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  रिंगरोडचा प्रश्नांवर मार्ग काढायला लागणार आहे. पण त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे जमिनी जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.''  

ज्या नागरिकांना येथे घरं मिळाली त्यांनी विकण्याच्या भानगडीत पडू नका 

''सदा आनंदनगर योजनेमुळे सदानंद शेट्टी यांच्यावरचा लोकांचा विश्वास अजून वाढला आहे. लोकांना मूलभूत गरजा मिळणं जास्त गरजेचं असतं. आता या घरांमध्ये च्यवस्थित रहा, चांगल्या सवयी लावून घ्या, मुलंबाळं कसे नीट राहतील त्याकडे लक्ष द्या. ज्यांना ज्यांना हे घर मिळणार आहे, ते घर विकण्याच्या भानगडीत पडू नका. जर हे झालं तर राज्यकर्त्यांना असं वाटू शकतं की याना चांगली घरं दिली तर हे लोक घर विकून पुन्हा अडगळीच्या जागी राहायला जातात. असा सल्लाही पवारांनी यावेळी दिलाय.''

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रो