शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पुण्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे तीनही कार्यक्रमात मौनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 12:30 IST

पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार,आमदार यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या पाण्याविषयी विचारणा केलेली दिसली नाही.

ठळक मुद्देपुणेकरांचा पाणीप्रश्न  अधातंरीचउपमहापौरांचे ‘पुण्याचा पाणी पुरवठा सध्या आहे तितकाच ठेवावा’ अशी मागणी करणारे पत्रजलसंपदाकडून पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार कायम

पुणे : पुण्याचे पाणी कमी होऊ देणार नाही असे आश्वासन महापालिका पदाधिकाऱ्यांना देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या त्यांच्या तीनही जाहीर कार्यक्रमात पुण्याच्या पाण्याविषयी मौनच बाळगले. महापौर व अन्य पदाधिकारी परदेश दौऱ्यावर असल्यामुळे या कार्यक्रमांना अनुपस्थितच होते. पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार,आमदार यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारणा केलेली दिसली नाही.उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘पुण्याचा पाणी पुरवठा सध्या आहे तितकाच ठेवावा’ अशी मागणी करणारे पत्र नळस्टॉप चौकातील कार्यक्रमात दिले, पण या पत्राचे उत्तर त्यांनी काय दिले ते समजू शकले नाही. जलसंपदाने पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार कायम ठेवली आहे. सध्या रोज १३५० दशलक्ष लिटर पाणी मिळते आहे. तरीही ते सलग ५ तास एकवेळ द्यावे लागते. तेही अनेक भागात नियमित मिळत नाही. दररोज ११५० दशलक्ष लिटर पाणीच देणार असे जलसंपदाचे म्हणणे आहे. तसे झाले तर पुणे शहराला तेवढे पाणी पुरवताना महापालिकेची ओढाताण होणार आहे.त्यामुळेच महापालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुण्याचा पाणी पुरवठा आहे तेवढाच ठेवावा अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुण्याच्या पाण्यात कपात होऊ देणार नाही असे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे तर जलसंपदा खात्याच्या सचिवांशी फोनवर चर्चा करून त्यांना तसा आदेश काढायलाही सांगितले होते. पण आता त्याला पंधरापेक्षा जास्त दिवस झाले तरीही जलसंपदाला असा आदेश मिळालेला नाही. तोंडीही कोणी काही सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे फक्त ११५० दशलक्ष लिटरच पाणी दररोज घ्या असा तगादा लावला आहे.पुण्यात शुक्रवारी झालेल्या तीन जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री याविषयी काहीतरी बोलतील अशी पुणेकरांची अपेक्षा होती. त्यातही बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करताना ते यावर भाष्य करतील असे बोलले जात होते. मात्र तिथेही त्यांनी निराशा केली. त्यानंतर नळस्टॉप येथे मेट्रो व महापालिका यांच्या संयुक्त कार्यक्रमात उड्डाणपुलाचे भूमीपूजन करत असतानाही त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. याच कार्यक्रमात उपमहापौर डॉ. धेंडे यांनी त्यांना पाणी पुरवठा सध्या आहे तेवढाच कायम ठेवावा अशी मागणी करणारे पत्र दिले. त्यांंंनी कपात होणार नाही असे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWaterपाणी