शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

अख्खं आयुष्य सरलं; पण डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:44 IST

सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास...

ठळक मुद्देआदिवासी भगिनींच्या व्यथा : गावात मुली देण्यासही तयार नाही

संतोष जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : ‘‘अख्खं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय! सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा किव येणार अन् आमच्या डोईवरचा हंडा कव्हा खाली येणार? मुलकातल्या पोरी आमच्या गावाली द्यायचं म्हटलं तर पोरीचा बा म्हणतो ‘नको गड्या पक्की पाण्याची टिपावं (दुष्काळ) हाय, तुमच्या मुलकाली त्या गावाली माया पोरीचा आख्खं आयुष्यभर पाणी भरता भरता जायचं’, आमच्या गावाली पोरी द्यायला कोणी धजत नाही,’’ हे शब्द आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांमध्ये  राहणाऱ्या आदिवासी महिला रखमाबाई वाजे यांचे.

आदिवासी भागात असलेले कोंढवळ हे गाव वन विभागाच्या खोडा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने व भौतिक सेवा-सुविधांच्या अभावाने आबाळलेलेच. सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास. भीमाशंकर अभयारण्यात वसलेल्या या गावाला एकदा का उन्हाळ्याची चाहूल लागली की या गावातील आदिवासी बांधवांना दुष्काळाशी सामना करावा लागतो.  या पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगर दऱ्याखोऱ्यातून खडतर पायपीट करावी लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये हजार ते दीड हजार फूट दरीमध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये कोंढवळ हे गाव वसलेले आहे. जवळच असलेल्या शिंदेवाडी, गवांदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी, केवाळवाडी या वाड्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र घालवावी लागत आहे. संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यासाठी एक कूपनलिका ती ही आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पुन्हा अडीचशे ते तीनशे फूट खाली खोल दरीत उतरून पुन्हा तेवढेच वर चढून चोंडीच्या झऱ्याच्या धबधब्यावरून हंडा वर काढताना यातना सहन कराव्या लागत आहेत.

एकीकडे घोटभर पाणी प्यायला नाही मिळाल्यावर मरण तर दुसरीकडे पाणी आणताना दरीत पाय घसरून पडले तर मरण, आम्ही जीवन जगायचे तरी कसे, या वयाला वयात आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे लोटली? आम्ही पारतंत्र्यातच आहोत.

- साळीबाई दाते, ग्रामस्थ   

टॅग्स :ambegaonआंबेगावWaterपाणीdroughtदुष्काळ