शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अख्खं आयुष्य सरलं; पण डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:44 IST

सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास...

ठळक मुद्देआदिवासी भगिनींच्या व्यथा : गावात मुली देण्यासही तयार नाही

संतोष जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : ‘‘अख्खं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय! सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा किव येणार अन् आमच्या डोईवरचा हंडा कव्हा खाली येणार? मुलकातल्या पोरी आमच्या गावाली द्यायचं म्हटलं तर पोरीचा बा म्हणतो ‘नको गड्या पक्की पाण्याची टिपावं (दुष्काळ) हाय, तुमच्या मुलकाली त्या गावाली माया पोरीचा आख्खं आयुष्यभर पाणी भरता भरता जायचं’, आमच्या गावाली पोरी द्यायला कोणी धजत नाही,’’ हे शब्द आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांमध्ये  राहणाऱ्या आदिवासी महिला रखमाबाई वाजे यांचे.

आदिवासी भागात असलेले कोंढवळ हे गाव वन विभागाच्या खोडा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने व भौतिक सेवा-सुविधांच्या अभावाने आबाळलेलेच. सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास. भीमाशंकर अभयारण्यात वसलेल्या या गावाला एकदा का उन्हाळ्याची चाहूल लागली की या गावातील आदिवासी बांधवांना दुष्काळाशी सामना करावा लागतो.  या पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगर दऱ्याखोऱ्यातून खडतर पायपीट करावी लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये हजार ते दीड हजार फूट दरीमध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये कोंढवळ हे गाव वसलेले आहे. जवळच असलेल्या शिंदेवाडी, गवांदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी, केवाळवाडी या वाड्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र घालवावी लागत आहे. संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यासाठी एक कूपनलिका ती ही आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पुन्हा अडीचशे ते तीनशे फूट खाली खोल दरीत उतरून पुन्हा तेवढेच वर चढून चोंडीच्या झऱ्याच्या धबधब्यावरून हंडा वर काढताना यातना सहन कराव्या लागत आहेत.

एकीकडे घोटभर पाणी प्यायला नाही मिळाल्यावर मरण तर दुसरीकडे पाणी आणताना दरीत पाय घसरून पडले तर मरण, आम्ही जीवन जगायचे तरी कसे, या वयाला वयात आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे लोटली? आम्ही पारतंत्र्यातच आहोत.

- साळीबाई दाते, ग्रामस्थ   

टॅग्स :ambegaonआंबेगावWaterपाणीdroughtदुष्काळ